Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भारतात हुकूमशाही आहे, हे म्हणणे सर्वस्वी चुकीचे आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी

11

दिवाकर, अखिलेश सिंह व सिद्धार्थ, टाइम्स वृत्तसेवा, नवी दिल्ली :‘काँग्रेसने धार्मिक आधारावर आरक्षण देण्यासाठी कायदे करून राज्यघटनेचे उल्लंघन केले हे सांगणे म्हणजे ध्रुवीकरण नव्हे,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर होणारे, भाषणांतून ध्रुवीकरण करीत असल्याचे आरोप फेटाळून लावले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तसमूहाला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधानांनी विविध विषयांवरील प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. ‘ज्यांनी राज्यघटनेत अनेकदा बदल केले त्यांनी आमच्यावर आम्ही राज्यघटना बदलून टाकू असा आरोप करणे दुर्दैवी आहे,’ असा घणाघातही पंतप्रधान मोदी यांनी केला.लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यानंतर विरोधकांना त्यांच्या पराभवाची खात्री पटली असून ते आता कोणतेही आरोप करत असल्याचेही मोदी म्हणाले. ‘या देशात‘युवराजां’ना सत्ता मिळत नाही म्हणून भारतात हुकूमशाही आहे, हे म्हणणेही सर्वस्वी चुकीचे आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे दोन टप्पे झाल्यानंतर पंतप्रधानांनी ही विशेष मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांच्यावर विरोधकांच्या वतीने करण्यात येत असलेल्या आरोपांना त्यांनी सविस्तर प्रत्युत्तर दिलेच; पण त्याचबरोबर देशासमोर नक्की कोणती आव्हाने आहेत याचाही सविस्तर ऊहापोह केला.
२०१९मधील शपथविधीवर अजितदादांनी सगळंच सांगितलं, म्हणाले- हे सगळं सांगण्यावरूनच घडलं…

ते म्हणाले, ‘घटनाबदल करण्याच्या आरोपापूर्वी मी केलेल्या कामाचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडत असल्यापासून गेली दहा वर्षे पंतप्रधान म्हणून काम करीत असलेल्या निर्णयांचा मागोवा घेतला तर त्यामध्ये घटनाबदल करण्यासारखा एकही निर्णय नसल्याचे तुमच्या लक्षात येईल.’

‘इंडिया शायनिंग’चा प्रचार केला तशीच वेळ भाजपवर येणार असल्याच्या विरोधकांच्या म्हणण्याचाही त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, ‘प्रत्येक निवडणूक ही वेगळ्या मुद्द्यांवर लढविली जाते. या निवडणुकीत भाजपला जननेतून अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. याउलट काँग्रेसच्या ‘युवराजां’नी दुसऱ्याच्या उद्धटपणाविषयी बोलणे त्यांना शोभत नाही. अर्थात काँग्रेसला आता आशा चमत्कारांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शस्त्रे खाली टाकत आपला पराभव मान्य केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्हाला दणदणीत विजय मिळेल याची मला खात्री वाटते.’

देशातील लोकशाही धोक्यात असल्याच्या विरोधकांचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले, ‘युवराजांना निवडणूक जिंकता येत नाही म्हणून भारतातील लोकशाही ही हुकूमशाही ठरत नाही. ‘युवराजांना’ही येथे निवडणूक लढवावी लागते. त्यांच्याकडे देशातील जनता आकृष्ट होत नाही म्हणून या देशातील लोकशाहीचा दर्जा हीन ठरत नाही. संकुचित लोकशाही म्हणत हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू असल्याचा आरोप हा विरोधकांच्या पराभूत मानसिकतेचे लक्षण आहे. सत्ता मिळत नाही म्हणून देशाची प्रतिमा जागतिक पातळवीर मलीन करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून केले जात आहेत.’

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.