Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अखेर महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी, ‘त्या’ रानटी हत्तीची दहशत सुरूच, पाच जणांनी गमावला जीव

8

गडचिरोली: भामरागड तालुक्यातील हिदूर येथे रानटी हत्तीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तीन महिलांपैकी दुसऱ्या महिलेचाही अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. २५ एप्रिल रोजी कियर येथील गोंगलू रामा तेलामी या शेतकऱ्यास दुपारी ठार केल्यानंतर रात्री त्याच रानटी हत्तीने हिदूर गावात धुडगूस घालून तीन महिलांना गंभीर जखमी केले. त्यापैकी राजे कोपा हलामी (५०) हिचा २६ एप्रिल रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर महारी देवू वड्डे (५०) हिच्यावर नागपूर येथे उपचार सुरू असताना काल २८ एप्रिल रोजी तिने अखेरचा श्वास घेतला तर वंजे जुरू पुंगाटी (४७) या महिलेवर गडचिरोली येथे उपचार सुरू असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.
अजितदादा आणि तावरे १५ वर्षानंतर एकत्र आले पण चंद्रराव बोललेच नाहीत!
तेलंगणा राज्यात दोन शेतकऱ्यांना ठार करून त्या रानटी हत्तीने भामरागड तालुक्यात प्रवेश केला होता. २५ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास या तालुक्यातील कियर येथील शेतशिवारात काम करीत असलेल्या गोंगलू तेलामी नामक शेतकऱ्याला पायाखाली तुडवून ठार केले. त्यानंतर हा हत्ती त्या भागातून पसार होऊन आरेवाडावरून दोन किलोमीटरवर असलेल्या हिदूर या गावात गेला. याठिकाणी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास सुरु असलेल्या माता पूजनाच्या कार्यक्रमात त्याने धुडगूस घालून महारी वड्डे, राजे आलामी आणि वंजे पुंगाटी यांना गंभीर जखमी केले.२५ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास तिन्ही महिलांना भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने त्यांना नागपूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले. २६ एप्रिल रोजी उपचारादरम्यान राजे कोपा हलामी (५०) हिचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. तर २८ एप्रिल रोजी महारी वड्डे हिने देखील अखेरचा श्वास घेतला.

हेमंत गोडसेंचा पत्ता कट? स्वामी शांतिगिरी महाराजांचा शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल

तेलंगाना राज्यात दोन शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या रानटी हत्तीने महाराष्ट्रात प्रवेश करत सिरोंचा वनविभागातील रेपणपल्ली वनपरिक्षेत्रात तब्बल १८ दिवस मुक्काम ठोकून बाहेर पडताच भामरागड तालुक्यात एक पुरुष आणि दोन महिलांचा बळी घेतला. त्यामुळे या रानटी हत्तीच्या हल्ल्यात बळी गेलेल्या निष्पाप लोकांची संख्या आता पाच वर पोहोचली आहे. रानटी हत्तीने कियर आणि हिदूर या दोन्ही गावात तीन बळी घेतल्याने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. सध्या हा रानटी हत्ती भामरागड वनपरिक्षेत्रातून पुढे छत्तीसगड राज्यातील जंगल परिसरात गेल्याचे बोलले जात असलेतरी आणखी जीवितहानी होऊ नये म्हणून त्या हत्तीवर वनविभागाने नजर ठेवली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.