Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

rainfall in kolhapur: पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ; इचलकरंजी बंधारा पाण्याखाली

23

हायलाइट्स:

  • पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ.
  • इचलकरंजी बंधारा पाण्याखाली गेला आहे.
  • दुधगंगा धरणाच्या मुख्य भिंतीला गळती.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहर व जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने सखल भागात पाणीच पाणी साचले आहे. शहरात पावसाचे प्रमाण अधिक नसले तरी जिल्ह्याच्या काही भागात दिवसभर अनेकदा पावसाने झोडपून काढले. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने इचलकरंजी बंधारा पाण्याखाली गेला आहे. (the water level of panchganga river has risen due to which ichalkaranji dam has gone under water)

गेले पंधरा दिवस पावसाने या भागात पूर्णपणे विश्रांती घेतली होती. मंगळवारी एक दोन वेळा पावसाने हजेरी लावली. पण त्याचा जोर नव्हता. मध्यरात्रीनंतर मात्र त्याचा जोर वाढला. मध्यरात्री शहराला पावसाने चांगलेच झोडपून काढले. बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

क्लिक करा आणि वाचा- ‘शेतकऱ्यांनी धीर सोडू नये’; पूरस्थितीबाबत मुख्यमत्र्यांचे प्रशानाला ‘हे’ आदेश

दिवसभरात भुदरगड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद

दिवसभरात अनेकदा पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शनही झाले नाही. सायंकाळी तर हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला. रिमझिम पाऊस आणि गारवा यामुळे रस्त्यावरील वर्दळही कमी झाली. शहरात पावसाचे प्रमाण अधिक नसले तरी जिल्ह्याच्या काही भागात दिवसभर अनेकदा पावसाने झोडपून काढले. मिळालेल्या माहितीनुसार दिवसभरात भुदरगड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याने इचलकरंजी बंधारा पाण्याखाली गेला आहे.

क्लिक करा आणि वाचा- पंजाबमध्ये सिद्धू, तसे महाराष्ट्रात संजय राऊत: नितेश राणेंचा टोला

दुधगंगा धरणाच्या मुख्य भिंतीला गळती

काळमवाडी येथील दुधगंगा धरणाच्या मुख्य भिंतीला गळती लागल्याचे वृत्त आहे. मुख्य भिंतीतून प्रतिसेकंद ३०० लिटर पाण्याची गळती होत असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. ही गळती गंभीर असून लाखो लिटर पाण्याची गळती होत आहे, असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. मेघोली धरण फुटीसारखी दुर्घटना घडण्याची वाट बघण्यापेक्षा, तसे घडण्याआधीच मुख्य भिंतीची दुरुस्ती करा, अशी मागणी संघटनेने केली आहे. असे न झाल्यास धरण दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलन छेडण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

क्लिक करा आणि वाचा- करोना: मुंबईत आज ६ करोना बाधितांचा मृत्यू; पाहा, ‘अशी’ आहे ताजी स्थिती

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.