Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Fact Check: देशात ३०० दहशतवादी घुसणार वक्तव्य आताचे नाही; जेपी नड्डांबाबत केल्या जाणाऱ्या दाव्याचं सत्य काय?
कात्रण व्हायरल
एका ट्विटर यूजरने वर्तमानपत्राचं कात्रण शेअर करत लिहिलंय, ‘निवडणुकीत दहशतवादी आले…, पण ३०० दहशतवादी देशात घुसणार आहेत, हे नड्डा यांना कसे कळले?’ यासोबत दैनिक भास्कर वृत्तपत्राचं कात्रणही लावण्यात आलं आहे. या कात्रणावरुन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी निवडणूक प्रचारादरम्यान असं वक्तव्य केल्याचा दावा केला जात आहे.
काय आहे सत्य?
फॅक्ट चेक बूमने या दाव्याची पडताळणी करण्यासाठी नड्डा यांचं विधान गुगल सर्च केलं. त्यावेळी दैनिक भास्करच्या वेबसाइटवर चार वर्ष जुना एक न्यूज रिपोर्ट मिळाला. २१ ऑक्टोबर २०२० रोजी प्रकाशीत हा रिपोर्ट बिहारच्या बक्सरमधील जे.पी. नड्डा यांच्या एनडीए पक्षातील एका जनसभेशी जोडलेला होता. भास्करने आपल्या रिपोर्टमध्ये या जनसभेबाबत लिहिलेलं, की नड्डा यांनी स्थानिक मुद्द्यांवर चर्चा केली नाही.
रिपोर्टमध्ये नड्डा यांच्या हवाल्याने लिहिलेले, की ‘आजचा रिपोर्ट असा आहे की ३०० दहशतवादी देशात घुसणार आहेत, आमचे सैनिक त्यांना ठार करतील. जे वाचतील त्यांना फाशीची शिक्षा मिळेल. सीमेवरील सुरक्षेला आधार मानून त्यांनी एनडीए आघाडीला विजयी करण्याचे आवाहन केले.’
बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. भाजपच्या यूट्यूब चॅनलवर या जाहीर सभेतील नड्डा यांच्या भाषणाचा व्हिडिओ पाहायला मिळाला. व्हिडिओमध्ये ४३ मिनिटं १८ सेकंदात नड्डा यांचं वक्तव्य ऐकू येतं. ते म्हणतात, ‘आजची बातमी आहे की ३०० दहशतवादी ७ ठिकाणांहून सीमेवर घुसण्याचा प्रयत्न करत आहेत.’
निष्कर्ष
जेपी नड्डा यांचं हे विधान आताचं नसल्याचं तपासात समोर आलं आहे. वृत्तपत्रातील कात्रण कापून ते व्हायरल केलं गेलं होतं, जे नंतर २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीचं असल्याचं समजलं. त्यामुळे तपासात हा दावा खरा ठरला नाही.
(This story was originally published by Boom Fact Check, and republished by MT as part of the Shakti Collective.)