Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Deforestation : संशोधनातील धक्कादायक खुलासा! चार वर्षांत ५० लाख झाडे नष्ट, ‘या’ कारणांमुळे वृक्षतोड

10

नवी दिल्ली : भारतात २०१८ ते २०२२ या कालावधीत शेतजमिनींमधील ५० लाखांहून अधिक मोठी झाडे नामशेष झाल्याचे धक्कादायक वास्तव संशोधनातून पुढे आले आहे. डेन्मार्कमधील कोपनहेगन विद्यीपाठातील अभ्यासकांनी हे संशोधन केले असून, ‘नेचर सस्टेनेबिलिटी’ या नियतकालिकात ते प्रकाशित झाले आहे.

मोठी झाडे नामशेष होण्याची कारणे


– गेल्या काही दिवसांत कृषी वनीकरणाऐवजी (अॅग्रोफॉरेस्ट्री) काही शेतकऱ्यांनी केवळ शेतीला पसंती दिली आहे. मोठी झाडे तोडण्याचे हे सर्वांत मोठे कारण आहे. मोठी झाडे तोडून त्या जागेचे रूपांतर प्रामुख्याने भातशेतीसाठी वापरण्यात आल्याचे दिसते. त्यामु‌ळे शेतकरी कृषी वनीकरणाच्या फायद्यांनाही मुकत आहेत.

Nagpur Weather Updates : हा उन्हाळा की पावसाळा? बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम
– शेतातील मोठी आणि वाढलेली झाडे कापली गेली आहेत. आता ‘ब्लॉक प्लँटेशन’ करून म्हणजे जमिनीच्या विशिष्ट तुकड्यात किंवा पट्ट्यात वेगवेगळी किंवा एकाच जातीची झाडे लावली जात आहेत. तेलंगण, हरियाणा, महाराष्ट्रासह काही राज्यांतील शेतकऱ्यांनी अशा प्रकारची लागवड केल्याचे सांगितले.

– झाडांच्या सावलीमुळे पिकांवर विपरीत परिणाम होईल, या काळजीनेही शेतातील मोठी झाडे काढली गेली आहेत.

– कृषी वनीकरण हा भारतीय भूप्रदेशाचा महत्त्वाचा भाग होता. झाडे कार्बन डायऑक्साइड शोषून घेत असल्याने वातावरण शुद्ध ठेवण्याचा हा नैसर्गिक उपाय आहे. मात्र, त्याकडे शेतकरी पाठ फिरवत आहे.

कृषी वनीकरण म्हणजे काय?

शेती करण्यासोबतच मोठी झाडेही शेतात लावणे म्हणजे कृषी वनीकरण होय. कृषी वनीकरण केल्यास झाडे शेतातील पिकांना पूरक ठरतात. ही झाडे सावली देतात, वारा देतात, जमिनीची धूप रोखतात, झाडाची मुळे माती स्थिर करतात, झाडे आणि पिकांचा मेळ घातल्याने मातीचे आरोग्यही सुधारते.

असा केला अभ्यास

– संशोधकांनी एआय-आधारित ‘डीप लर्निंग मॉडेल’चा वापर केला. जेणेकरून दर वर्षी वनांबाहेरील झाडांची नोंद केली गेली आणि बदलांचे विश्लेषण केले.

– संशोधकांनी ‘ब्लॉक वृक्षारोपण’ वगळून शेतजमिनीवरील सुमारे ६० कोटी झाडांचे ‘मॅपिंग’ करून गेल्या दशकभरात त्यांचा मागोवा घेतला.

– २०१०-११ मध्ये नोंदल्या गेलेल्या मोठ्या झाडांपैकी ११ टक्के झाडे २०१८पर्यंत नामशेष झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.