
Tej Police Times
मी निवडणूक प्रचारात सहभागी व्हायला हवं अशी पक्षाची इच्छा होती, तर मग तुम्ही मला संपर्क करायला हवा होता. २ मार्च २०२४ रोजी मी घोषणा केल्यानंतर झारखंडच्या कोणत्याही वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं अथवा आमदार, खासदारानं मला संपर्क केला नाही. मला कोणत्याही कार्यक्रम, रॅली, संघटनेच्या बैठकीचं आमंत्रण दिलं गेलं नाही. बाबुलाल मरांडी यांना मला एखाद्या कार्यक्रमाला बोलवायचं होतं, तर मग त्यांनी मला आमंत्रण द्यायला हवं होतं. पण त्यांनी तसं केलं नाही, अशा शब्दांत सिन्हा यांनी पक्षाच्या कारणे दाखवा नोटिशीला उत्तर दिलं आहे.
Pune Car Accident: दोघांचा जीव घेणाऱ्या कारबद्दल धक्कादायक माहिती उघड; अगरवालच्या सूचनेचाही तपासातून उलगडा
जयस्वाल यांनी २९ एप्रिलच्या संध्याकाळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संपर्क साधला, आमंत्रण दिलं. तेव्हा मी दिल्लीत होतो. उशिरा आमंत्रण मिळाल्यानं १ मेच्या सकाळी हजारीबागला पोहोचणं शक्य नव्हतं. २ मे रोजी हजारीबागला पोहोचलो. जयस्वाल यांच्या भेटीसाठी त्यांचं घर गाठलं. मनिष तिथे नव्हते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर जयस्वाल यांच्याशी संपर्क झाला नाही, असा घटनाक्रम सिन्हा यांनी पत्रात मांडला आहे.
वैयक्तिक कारणांमुळे १० मे रोजी परदेशी गेलो. त्याची माहिती लोकसभेच्या अध्यक्षांना दिली होती. पक्ष मला कोणत्याही कार्यक्रमात बोलावत नव्हता. त्यामुळे इथे थांबण्याची गरज मला वाटली नाही. परदेशात जाण्याआधी मी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केलं. त्यामुळे मताधिकाराचा वापर केला नाही, असा आरोप करणं चुकीचं ठरेल. मी २५ वर्षांपासून पक्षासोबत आहे. प्रत्येक जबाबदारी पेलली आहे. निष्ठेनं पक्षाची साथ दिली आहे. त्यामुळे तुम्ही पत्र सार्वजनिक करणं चुकीचं होतं, असं सिन्हा यांनी पत्रात म्हटलं आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.