Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Narendra Modi: भारताची प्रतिष्ठा जगभरात वाढली, गेल्या १० वर्षाच्या कारकिर्दीबाबत मोदींचा दावा

7

नवी दिल्ली : ‘ईडी आणि अन्य तपास यंत्रणांवर आरोप करणारे विरोधक त्यांच्यावर चुकीचे आरोप करण्यात आले असल्याचे एकाही प्रकरणात सिद्ध करू शकलेले नाहीत. भारताच्या परराष्ट्र धोरणाची इतकी चर्चा होत असलेली कदाचित ही पहिलीच निवडणूक असावी. कारण गेल्या १० वर्षांत भारताची प्रतिष्ठा जगभरात वाढली आहे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. निवडणूक प्रचारात व्यग्र असतानाही पंतप्रधान मोदी अशा विविध मुद्द्यांवर दिल्लीमध्ये ‘नवभारत टाइम्स’चे आशीष पांडे आणि नरेंद्र नाथ यांच्याशी मोकळेपणाने बोलले.निवडणुकीत भाजप केवळ मोदी लाटेवर अवलंबून असल्याचा तर्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेटाळून लावला. या मुद्द्यावर प्रथमच विस्ताराने बोलताना ते म्हणाले, ‘भारतीय जनता पक्ष एक चमू म्हणून संघभावनेने काम करतो. या चमूमधील प्रत्येक जण निवडणूक जिंकण्यासाठी मेहनत करीत आहे. घराणेशाही जपणाऱ्या पक्षांमध्ये मात्र कुटुंब किंवा एखादी व्यक्ती खूप महत्त्वाची असते. आमच्या पक्षामध्ये प्रत्येक नेता व कार्यकर्त्यावर जबाबदारी टाकली जाते.’ दिल्लीतील आम आदमी पक्ष आणि काँग्रेसच्या आघाडीबाबत पंतप्रधान म्हणाले की, विरोधकांच्या ‘इंडिया’चे घटक पक्ष दोन गोष्टींसाठी ओळखले जातात… एक भ्रष्टाचार आणि दुसरा निर्लज्जपणे खोटे बोलणे.
Kamya Karthikeyan: सोळावं वरीस विक्रम करण्याचं! मुंबईची लेक ठरली देशातील सर्वांत तरुण ‘एव्हरेस्टवीर’

गेल्या १० वर्षांमध्ये महागाई आणि बेरोजगारी वाढली असल्याच्या विरोधकांच्या आरोपाचाही पंतप्रधान मोदी यांनी या विशेष मुलाखतीत सविस्तर समाचार घेतला. ‘यूपीएच्या काळात महागाईचा दर दुहेरी अंकात असायचा. सध्या जगाच्या कानाकोपऱ्यात युद्धाची परिस्थिती आहे. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि महागाईवर झाला आहे. तरीही आमच्या सरकारने पेट्रोल-डिझेलची दरवाढ होऊ दिली नाही. गेल्या १० वर्षांमध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. लाखो तरुणांना सरकारी नोकरी मिळाली आहे. खासगी क्षेत्रामध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत’, असे मोदी यांनी सांगितले.

डीपफेक आणि कृत्रिम प्रज्ञा या तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगावर पंतप्रधान मोदी यांनी चिंता व्यक्त केली. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खोट्या बातम्या आणि कपोलकल्पित घटनांशी काहीही संबंध नाही’, असे ते म्हणाले. आपले सरकार आल्यास काहीही झाले तरी ठरलेल्या वेळेत महिला आरक्षण लागू होईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

वाराणसीच्या आपल्या खासदारकीच्या कार्यकाळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘इथे प्रत्येक काम केवळ गंगामातेच्या आशीर्वादानेच फलदायी ठरते. १० वर्षांपूर्वी जेव्हा मी म्हणालो होतो की, गंगामातेने मला बोलावले आहे, तेव्हा मी ते त्याच भावनेने सांगितले होते.’ आता गंगामातेने आपल्याला दत्तक घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. ‘उत्तर प्रदेशातील पूर्वांचल हे सुरुवातीला दुर्लक्षित होते. काँग्रेस सरकारच्या काळात पूर्वांचलची जनता अशा सुविधा मिळण्याचा विचारही करीत नव्हती. कारण वीज, पाणी, रस्ते या मूलभूत सुविधांमध्येच लोकांना अडकवून ठेवण्यात आले होते. पूर्वांचलमधून त्यांचे मुख्यमंत्री निवडून आले तेव्हाही हीच परिस्थिती होती. त्याकाळी फक्त नेत्यांची हेलिकॉप्टर पूर्वांचलमध्ये उतरायची, आज विकास जमिनीवर पोहोचला आहे’, या शब्दांत मोदी यांनी काँग्रेस राजवटीवर टीका केली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.