तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Cyclone Remal Alert: रेमल चक्रीवादळ बंगालच्या किनाऱ्यावर धडकेल? IMDकडून ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

0 32

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : ‘रेमल’ चक्रीवादळ रविवारी सायंकाळी पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱ्यावर धडकेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. परिणामी, पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरील जिल्हे, उत्तर ओडिशा, मिझोराम, त्रिपुरा आणि मणिपूरच्या दक्षिणेकडील भागात २६ आणि २७ मे रोजी मुसळधार पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

पूर्वमोसमी हंगामातील हे पहिले चक्रीवादळ आहे. ते १०२ किलोमीटर प्रती तास या वेगाने धडकेल, असे हवामान विभागातील शास्त्रज्ञ मोनिका शर्मा यांनी म्हटले आहे.

समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी किनाऱ्यावर परतावे, असा सल्ला देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. सागरीपृष्ठाचे तापमान वाढत आहे. गेल्या ३० वर्षांचा आढावा घेतल्यास अशा परिस्थितीत चक्रीवादळ येणे साहजिक असल्याचे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डी. एस. पै यांनी म्हटले आहे.
Nashik Weather Update: नाशिकला उष्णतेचा ‘यलो अलर्ट’; २५ मेपर्यंत इशारा, आज कसं असेल हवामान?
केरळला पावसाचा तडाखा (फोटो आहे)

कोची : केरळमध्ये गुरुवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, एर्नाकुलम आणि त्रिसूर जिल्ह्यांत पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. अनेक ठिकाणी ‘रेड अॅलर्ट’ देण्यात आला आहे. दरम्यान १९ मे पासूनच्या चार दिवसांत राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.

गुरुवारी तिरुवनंतपूरम, कोची आणि त्रिसूरसह अन्य महत्त्वाच्या शहरांना पावसाने तडाखा दिला. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले. कोचीमधील बस स्टँडमध्ये पाणी भरले. एर्नाकुलम आणि त्रिसूर जिल्ह्यांचा आधीचा ‘ऑरेंज अलर्ट’ वाढवून आता ‘रेड अॅलर्ट’ करण्यात आला आहे. तर अलापुझा, कोट्टायम, इदुक्की, पलक्कड, वायनाड आदी जिल्ह्यांना ‘ऑरेंज अॅलर्ट’ देण्यात आला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.