Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Rishi Sunak : ‘..तर तरुणांसाठी लष्करीसेवा बंधनकारक करणार’,पंतप्रधान ऋषी सुनक यांची मोठी घोषणा

6

लंडन : ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आज (२६ मे ) निवडणुकीपूर्वी पहिली मोठी घोषणा केली असून जर आमच्या पक्षाचे सरकार पुन्हा आले तर आम्ही तरुणांसाठी लष्करी सेवा बंधनकारक करणार असल्याचं सुनक यांनी म्हंटलं आहे.

तरुणांना सैन्यात काम करण्याची संधी मिळणार

एका प्रमोशनल व्हिडिओच्या माध्यमातून ऋषी सुनक यांनी घोषणा केली आहे. त्यांच्या घोषणेनुसार, १८ वर्षांच्या तरुणांना १२ महिने पूर्णवेळ लष्करी सेवा किंवा वर्षभरासाठी प्रत्येक महिन्याच्या एका आठवड्यासाठी राष्ट्रीय सेवा करण्याचा पर्याय दिला जाणार आहे. ज्या तरूणांना कायमस्वरूपी लष्करात सामावून घ्यायचे आहे,अशांसाठी पात्रता फेरी व विविध चाचण्या घेतल्या जाणार आहेत. त्याचबरोबर तरुणांना सायबर सुरक्षा क्षेत्रात देखील काम करण्याची संधी दिली जाणार असल्याचं सुनक यांनी म्हंटलं आहे.
आधी १० वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली, नंतर आरोपीचं कोर्टातच लग्न लावलं, न्यायाधीशांचा अजब निर्णय

ब्रिटनच्या लोकशाहीची मूल्ये धोक्यात

ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या लोकशाही पद्धतीबद्दल भीती व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, ”ब्रिटनची लोकशाही धोक्यात आहे. त्यामुळेच आम्ही अशी धाडसी योजना राबवण्याचा विचार केला आहे. अनिश्चित काळात स्पष्ट नियोजन आणि धाडसी निर्णय आवश्यक असतात, तरच आपले भविष्य सुरक्षित होऊ शकते. लष्करी सेवेमुळे तरुणांना ब्रिटनला अधिक सुरक्षित करण्यासाठी व एक मजबूत राष्ट्रीय संस्कृती निर्माण करण्यासाठी आवश्यक कौशल्ये मिळतील. असा आम्हाला विश्वास आहे.”

पराभवाच्या भीतीने ७८ खासदारांनी दिले राजीनामे

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी नुकतीच सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली. त्यानुसार चार जुलैला ही निवडणूक होणार असली तरी सुनक यांच्यासाठी मोठी परीक्षा ठरणार आहे. ही निवडणूक प्रत्यक्षात वर्षअखेरीस होणे अपेक्षित होते. पण वेळेआधीच निवडणूक जाहीर करून सुनक यांनी राजकीय अगतिकता दाखवल्याची चर्चा आहे. पण त्यामागचे कारणही तसेच आहे. त्यांच्या हुजूर पक्षाच्या तब्बल ७८ खासदारांनी आतापर्यंत राजीनामे दिले आहे. पक्षांतर्गत तसेच नागरिकांमध्ये असलेल्या नाराजीमुळे निवडणूक पक्षाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो, या भीतीनेच राजीनामा सत्र सुरू आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.