तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Mirzapur Polling Workers Death: अखेरच्या टप्प्यातील मतदानाच्या आधी धक्कादायक बातमी; निवडणूक ड्यूटीवर असलेल्या १३ जणांचा मृत्यू

0 26

मिर्जापूर: उत्तर प्रदेशमधील मिर्जापूर येथे लोकसभा निवडणुकीच्या कामावर असलेल्या १३ जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी या सर्वांना ताप आणि उच्च रक्तदाबाचा त्रास झाला होता. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयात या सर्वांचे निधन झाले. येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचाऱ्यांनी ही माहिती दिली. या सर्व कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.मिर्जापूर येथील मां विंध्यवासिनी स्वशासी राज्य वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजबहादुर कमल यांनी सांगितले की, मृतांमध्ये ७ होमगार्डचे जवान, ३ सफाई कर्मचारी, सीएमओ कार्यालयात नियुक्तीवर असलेला एक लिपिक, एक अधिकारी आणि होमगार्डच्या टीममधील एका शिपायाच्या समावेश आहे. हे सर्व जण जेव्हा वैद्यकीय महाविद्यालयात आले होते तेव्हा त्यांना प्रचंड ताप होता, उच्च रक्तदाब होता तसेच त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले होते. मिर्जापूर येथे उद्या एक जून रोजी शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात मतदान होणार आहे.


निवडणुकीच्या कामासाठी आलेल्या १३ कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी यावरून सरकारवर जोरदार टीका केली. ही घटना अतिशय वाईट आहे. सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. त्याच बरोबर जे अन्य कर्मचारी रुग्णालयात आहेत त्यांच्यावर योग्य उपचार होतील याची काळजी घ्यावी, असे यादव म्हणाले.
Ahilyadevi Holkar: अहिल्याबाई नव्हे आता अहिल्यादेवी, मुख्यमंत्र्यांची चौंडीत मोठी घोषणा; सरकारी दस्तऐवजात होणार सुधारणा

१६ होमगार्ड्स रुग्णालयात दाखल

प्रचंड उन्हामुळे १६ होमगार्ड्सची तब्येत बिघडली, त्यामुळे त्यांना ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. हे सर्व जण सातव्या टप्प्यासाठी ड्यूटीवर आले होते. या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी तापमान ५१ डिग्रीच्या पुढे गेले आहे. त्यामुळे याआधी अनेकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. शुक्रवारी मिर्जापूरमधील तापमान ४७ डिग्री इतके नोंदवण्यात आले होते. शनिवारी तापमान ४९ च्या पुढे जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Thane water supply: ठाणे शहरात ५ टक्के पाणी कपात लागू, ५ जूनपासून कपात १० टक्के पर्यंत वाढणार; ठाणे महापालिकेची माहिती

मिर्जापूरमध्ये ४३ जणांचा मृत्यू

देशभरात हिटवेटमुळे अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. मिर्जापूरमध्ये आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये ३२, ओडिसामध्ये १० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. झारखंडमध्ये गेल्या २४ तासात ५ तर राजस्थानमध्ये देखील ५ जणांचा मृत्यू झालाय.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.