
Tej Police Times
निवडणुकीच्या कामासाठी आलेल्या १३ कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी यावरून सरकारवर जोरदार टीका केली. ही घटना अतिशय वाईट आहे. सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. त्याच बरोबर जे अन्य कर्मचारी रुग्णालयात आहेत त्यांच्यावर योग्य उपचार होतील याची काळजी घ्यावी, असे यादव म्हणाले.
Ahilyadevi Holkar: अहिल्याबाई नव्हे आता अहिल्यादेवी, मुख्यमंत्र्यांची चौंडीत मोठी घोषणा; सरकारी दस्तऐवजात होणार सुधारणा
प्रचंड उन्हामुळे १६ होमगार्ड्सची तब्येत बिघडली, त्यामुळे त्यांना ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. हे सर्व जण सातव्या टप्प्यासाठी ड्यूटीवर आले होते. या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी तापमान ५१ डिग्रीच्या पुढे गेले आहे. त्यामुळे याआधी अनेकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. शुक्रवारी मिर्जापूरमधील तापमान ४७ डिग्री इतके नोंदवण्यात आले होते. शनिवारी तापमान ४९ च्या पुढे जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Thane water supply: ठाणे शहरात ५ टक्के पाणी कपात लागू, ५ जूनपासून कपात १० टक्के पर्यंत वाढणार; ठाणे महापालिकेची माहिती
देशभरात हिटवेटमुळे अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. मिर्जापूरमध्ये आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये ३२, ओडिसामध्ये १० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. झारखंडमध्ये गेल्या २४ तासात ५ तर राजस्थानमध्ये देखील ५ जणांचा मृत्यू झालाय.
Recover your password.
A password will be e-mailed to you.