
Tej Police Times

पंतप्रधान मोदींच्या या ट्वीटला दुजोरा देत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी देखील ट्वीट करत देशाच्या हा वाढता विकासदर मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातही पहायला मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
दरम्यान देशात सध्या अंतिम टप्प्यातील निवडणूका १ जूनला होत असून यामध्ये पंतप्रधान मोदी लढत असलेल्या उत्तरप्रदेशातील वाराणसी मतदारसंघाचाही समावेश आहे.निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सध्या कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे गुरुवारपासून ध्यानसाधना करत आहेत. ४ जून रोजी देशातील लोकसभा निवडणूकांचे निकाल जाहीर होतील.
अखेरच्या टप्प्यासाठी मतदान होण्याच्या आधी उत्तर प्रदेशमधील मिर्जापूर येथे निवडणूक ड्यूटीवर असलेल्या १३ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. मृत्यू झालेल्यांपैकी ७ होमगार्डचे जवान आहेत. तर अन्य ३० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या सर्वांना तापमान वाढीचा त्रास झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.