Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नरेंद्र मोदींच्या कुंडलीत अशुभ योग, २०२५ ला देणार राजीनामा? ज्योतिष्यांनी केली भविष्यवाणी

13

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा अखेरचा टप्पा एक जूनला पार पडला, यानंतर सगळ्याच मीडिया हाऊसच्या एक्झिट पोलनुसार भाजपला ३०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवला होता, तर एनडीएला ३५० हून अधिक जागा मिळतील असे भाकित करण्यात आले होते, मात्र २ जून रोजी नवभारतमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखाने वेगळेच भाकीत केले होते. ‘४ जून रोजी गुरू आणि बुध यांच्यातील ग्रहयुद्ध आणि शुक्राच्या पूर्ण अस्तामुळे आश्चर्यकारक निवडणुकीचे निकाल येतील’ असा दावा केला होता, २०१९ च्या निवडणुकांपेक्षा काँग्रेसच्या जागा यंदा दुप्पट होतील आणि इंडिया आघाडीतील प्रमुख पक्षांना समाधानकारक यश मिळेल असे भाकित करण्यात आले होते. यासह भाजप युतीमध्ये सरकार स्थापन करेल, परंतु सरकार चालवताना काही वादांना आणि मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागेल, असा अंदाजही वर्तवण्यात आला होता.

२०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ५२ जागा मिळवल्या, ज्याची संख्या आता ९९ वर पोहचली आहे. इंडिया आघाडीच्या मोठ्या पक्षांनीही दमदार कामगिरी केली आहे. समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये ३६ जागा जिंकल्या, तृणमूल काँग्रेसने २९ जागा मिळवल्या. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये द्रमुकने २२ जागांवर विजय मिळवलाय. विरोधकांच्या कामगिरीमुळे भाजपला सलग तिसऱ्या निवडणुकीत स्वबळावर बहुमत मिळवताना अडचणींना सामोरे जावे लागले. आता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होऊन इतिहास घडवतील की २४० जागा असलेल्या भाजपला शह देण्यासाठी इंडिया आघाडी नवी रणनीती आखणार? हे पाहणे उत्सुकतेचे असेल, ज्योतिषाच्या अंदाजानुसार काय होईल पाहुया
Lok Sabha Results: तेजस्वींकडून कौतुक, खर्गेंकडून संकेत; मोदींच्या हातून जाणार हुकमी एक्का? भाजपला मोठा धक्का?

आगामी युती सरकारमध्ये ‘किंगमेकर’ची भूमिका बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू निभावतील. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडने लोकसभेच्या १६ जागा लढवल्या आणि त्यापैकी त्यांनी १२ जागा जिंकल्या. नितीश कुमार यांचा जन्म १ मार्च १९५१ रोजी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी बख्तियारपूर येथे झालाय. सध्या त्यांच्या मिथुन राशीत राहू महादशाच्या प्रभावाखाली आहेत, आणि गुरु अगदी जवळ असल्याने त्यांचा कुंडलीत ‘चांडाल योग’ बनतोय, त्यामुळे नितीश कुमार एक संधीसाधू नेता बनतायत जे हितासाठी कोणात्याही आघाडीसोबत जुळवून घेवू शकतात. मिथुन राशीत, पंचमेश (मंत्रिपद) शुक्राची शुभ अंतरदशा ३१ मे २०२३ पासून सुरू होईल आणि ३१ मे २०२६ पर्यंत राहील. त्याच्या कुंडलीत, शुक्र मंगळासह दहाव्या घरात त्याच्या उच्च राशीत मीनमध्ये बसला आहे, ज्याला भाग्य घराचा स्वामी शनि देखील पाहत आहे. या शुभ योगामुळे नितीश कुमार यांना २०२४ मध्ये विशेषत: महत्त्वाकांक्षी बनण्याची शक्यता आहे. यामुळे नितीश कुमार पक्षासाठी ‘रेल्वे मंत्रालय’ आणि राज्याला ‘विशेष राज्याचा दर्जा’ द्या यांसारख्या गोष्टी केंद्रातून मागू शकतात. शिवाय, देशव्यापी ‘जात जनगणना’ची मागणी करत, समान नागरी संहिता आणि एनआरसी कायद्याचा विरोध करुन मोदींना आणखी अडचणीत आणू शकतात.
Narendra Modi: मोदी कमकुवत होतील, असा स्वप्नात देखील विचार करू नका! २०१४, २०१९ला मागे टाकणारी ठरेल तिसरी टर्म

चंद्राबाबू नायडू यांचा जन्म २० एप्रिल १९५० रोजी आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे झाला. त्याच्या मेष राशीच्या कुंडलीमध्ये सातवा स्वामी शुक्र लाभाच्या अकराव्या घरात नवव्या स्वामी गुरूसोबत अनुकूल राजयोग तयार करतो. या शुभ व्यूहरचनेमुळे मंत्रिपदाच्या पाचव्या घरात दशम स्वामी शनिसोबत मजबूत योगही निर्माण होतो. चंद्राबाबू नायडू यांनी केंद्राच्या आणि राज्याच्या राजकारणात पुनरागमन करण्यासाठी याच शक्तिशाली राजयोगाचा लाभ घेतला आहे, विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळवून आणि लोकसभा निवडणुकीत त्यांच्या तेलगू देसम पक्षाला १६ जागा नायडू यांनी जिंकून दिल्या आहेत. सध्या, बुधची विंशोत्तरी दशा त्याच्या मेष राशीच्या कुंडलीमध्ये सक्रिय आहे, जी त्याच्या चढत्या कुंडलीमध्ये सूर्याशी जुळवून, त्याच्या पक्षासाठी महत्त्वपूर्ण मंत्रालये मिळवून देण्याकडे निर्देश करते. कुंडलीतील बुधच्या प्रभावाचा फायदा घेत चंद्राबाबू नायडू भाजपकडे ‘माहिती तंत्रज्ञान’ आणि ‘दूरसंचार’ यासारख्या महत्त्वाच्या मंत्रालयांची मागणी करू शकतात. शिवाय, आंध्र प्रदेशला पाच वर्षांचा विशेष राज्याचा दर्जा आणि अमरावती ही राजधानी म्हणून घोषित करा अशी मागणी करु शकतात आणि मोदींसाठी नवी आव्हाने निर्माण करू शकतात.

ज्योतिषशास्त्रीय अंदाजांवर आधारित, नरेंद्र मोदी त्यांच्या जन्मपत्रिकेत चंद्र-मंगळ योगामुळे तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ शकतात, परंतु ते त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकत नाहीत. मोदींचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी गुजरातमधील मेहसाणा येथील वडनगर येथे दुपारी झाला. वृश्चिक राशीसह त्यांचा जन्म तक्ता सूचित करतो की चंद्र आणि मंगळाच्या ‘लक्ष्मी योगाने’ त्यांना प्रथम गुजरातमध्ये, नंतर दिल्लीत दोन दशकांपर्यंत बहुमताचे सरकार चालवण्यास सक्षम केले आहे. ५ जूननंतर, मोदींच्या तक्त्यामध्ये लग्नेश आणि षष्ठेश मंगळाची महादशा सुरू होईल, त्यानंतर अष्टमेश आणि एकादश बुधाची अंतरदशा, केतू आणि दशमेश सूर्याशी संयोग होत आहे. 9 जूनला चंद्र पुनर्वसु नक्षत्रात असेल किंवा 10 जूनला जेव्हा चंद्र पुष्यात प्रवेश करेल तेव्हा मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेऊ शकतात. तथापि, मंगळाच्या केतूच्या अशुभ प्रभावामुळे, विवाद आणि आरोग्याच्या समस्यांमुळे नरेंद्र मोदी यांना 2025 च्या अखेरीस राजीनामा द्यावा लागू शकतो.

नोट : हा लेख पूर्णपणे ज्योतिषीय गणिते आणि अंदाजांवर आधारित आहे. अंधश्रद्धा पसरवण्याचा महाराष्ट्र टाइम्सचा कोणाताही हेतू नाही, तसेच भविष्याबाबत किंवा परिणामांबाबत कोणताही दावा महाराष्ट्र टाइम्स करत नाही.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.