Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नड्डा झाले मंत्री, आता भाजपची धुरा मराठी नेत्याच्या हाती? ‘टास्कमास्टर’ची अध्यक्षपदी वर्णी?

10

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता भाजपला नवा अध्यक्ष मिळेल. आधी पक्षाध्यक्ष आणि मग केंद्रात मंत्री असा पॅटर्न सत्ताधारी पक्षात सलग तीनवेळा दिसला आहे. २०१४ मध्ये राजनाथ सिंह, २०१९ मध्ये अमित शहा, यांच्यानंतर आता २०२४ मध्ये जे. पी. नड्डा केंद्रात मंत्री झाले आहेत.

जानेवारी २०२० मध्ये नड्डा यांच्याकडे पक्षाकडे धुरा आली. त्यांचा कार्यकाळ यंदाच्या जानेवारीत संपला. पण लोकसभा निवडणूक असल्यानं त्यांना ६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ याच महिन्यात संपत आहे. नड्डा यांच्यानंतर अध्यक्षपदासाठी चार नावांची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान यांच्यापैकी एकाला अध्यक्षपद मिळेल अशी शक्यता होती. पण या चौघांची निवड मंत्रिमंडळात झाल्यानं भाजपची धुरा कोणाकडे जाणार, हा प्रश्न कायम राहिला आहे.
लोकसभेची पहिली टर्म, काल मंत्रिपदाची शपथ अन् आज भाजपचा मंत्री म्हणतोय, मला मोकळं करा! पण का?
भाजपचे महासचिव असलेले विनोद तावड आणि सुनील बन्सल यांची नावं अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहेत. विनोद तावडेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात शालेय शिक्षण मंत्री म्हणून काम केलं आहे. राज्य मंत्रिमंडळानंतर काम केल्यानंतर २०१९ मध्ये भाजपनं त्यांना विधानसभेत संधी दिली नाही. पण तावडेंनी कोणतीच खळखळ केली नाही. यानंतर त्यांना राष्ट्रीय राजकारणात पक्षानं संधी दिली. तावडेंनी संधीचं सोनं केलं.
कोकण, मराठवाड्याची पाटी कोरी, पण बुलढाण्याचा डबल धमाका; खडसे, जाधवांमुळे ‘अच्छे दिन’?
सध्याच्या घडीला विनोद तावडेंकडे बिहारचा प्रभार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. तावडेंनी अल्पावधीतच राष्ट्रीय राजकारणात छाप पाडली आहे. बिहारमधील राजकीय परिस्थिती, भाजपला बसू शकणारा फटका पाहता त्यांनी नितीश कुमारांच्या जेडीयुला एनडीएमध्ये पुन्हा आणलं. ती कामगिरी भाजपसाठी महत्त्वाची ठरली. तावडेंमुळे बिहारमध्ये भाजपचं संभाव्य नुकसान टळलं. कुमार यांचा पक्ष निवडणुकीनंतर किंगमेकर ठरला. तो इंडिया आघाडीत राहिला असता तर भाजपला सत्ता स्थापन करणं कठीण गेलं असतं.

सुनील बन्सल यांच्याकडे उत्तर प्रदेशमधील पक्षाच्या संघटनेची जबाबदारी होती. त्यानंतर त्यांच्याकडे महासचिवपद देण्यात आलं. पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणाचा प्रभार त्यांच्याकडे होता. देशभरातून येणारा फीडबॅक, त्याचं विश्लेषण करण्याची कामगिरी बन्सल यांनी पार पाडली. भाजपनं देशभरात उभारलेल्या कॉल सेंटर यंत्रणेतही त्यांनी जातीनं लक्ष घातलं.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.