Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोणाला दोन मुलं, तर कोण आधीच विवाहित, पैशांसाठी सामूहिक विवाह सोहळ्यात केले पुन्हा लग्न

12

Mass Marriage : छत्तीसगडमध्ये दिव्यांगासाठी सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. बहुउद्देशीय कल्याण संस्थेने हा विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. याच संस्थेने आधीसुद्धा अनेक जोडप्यांची अशी लग्न लावून दिली आहेत. पण यावेळी लग्न झालेल्या जोडप्यांना एक लाख रुपयांची मदत दिली जाणार होती, हीच बाब लक्षात घेवून अनेक लग्न झालेली, मुले झालेली जोडपी सुद्धा पुन्हा लग्न करण्यासाठी पोहचली होती.

घटना समोर आल्यानंतर सारेच चक्रावले. सामूहिक विवाहमध्ये मिळणाऱ्या पैशासाठी दुसरे लग्न करण्यासाठी चक्क दोन मुलांचे आईवडील पोहचले होते.संस्थेने सांगितले घटना समोर येताच अधिक तपास केले असता अनेक अल्पवयीन आणि लग्न झालेली जोडपी सामूहिक विवाहसोहळ्यात फक्त पैशांसाठी सहभागी झाल्याचे आढळले.
बापासाठी लेकींनी आयसीयूत बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर व्हिडिओ झाला व्हायरल

काही विवाहित जोडप्याविरोधात संस्थेने एफआयआर दाखल केली आहे.या संस्थेने आधीही अनेक लग्न लावून दिलीत पण यावेळी फक्त पैशांच्या आमिषामुळे हा प्रकार घडला असे दिसून येते, छत्तीसगड मधील अंबिकापुर, बिलासपुर, बस्तर आणि सरगुजा परिसरातून जोडपी आली होती. सामूहिक विवाह सोहळ्यात जवळपास ३०० जोडप्यांची लग्न लावणार होती पण यामध्ये शंभरहून अधिक व्यक्तींना संस्थेची फसवणूक केल्याचे आढळले.


छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव साय आणि खासदार विजय बघेल यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यांवी काही दिव्यांग दाम्पत्याला आशीर्वाद सुद्ध दिला. पण याच दरम्यान विवाहित जोडपी आणि अल्पवयीन मुलांची ही बाब समोर आली. संस्थेकडून दावा केला जातोय की यामध्ये महाराष्ट्र, ओडिशा आणि झारखंडची सुद्धा काही जोडपी पैशांसाठी पोहचली होती.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.