Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Kiran Gosavi: आर्यनला पकडून नेणारा किरण गोसावी गोत्यात; फसवणुकीचं नवं प्रकरण उघड

17

हायलाइट्स:

  • किरण गोसावीचे फसवणुकीचे नवे प्रकरण उघड.
  • पालघरमधील दोन तरुणांना १ लाख ६५ हजारांचा गंडा.
  • मलेशियात नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक.

पालघर: क्रूझवरील हायप्रोफाइल ड्रग्ज पार्टी प्रकरणात नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने पंच साक्षीदार बनवलेला आणि आर्यन खानसोबतचा सेल्फी व्हायरल झाल्याने प्रकाशझोतात आलेला किरण गोसावी उर्फ के. पी. गोसावी याने पालघरमधील दोन तरुणांची क्वालालंपूर येथे नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे नवे प्रकरण समोर आले आहे. संबंधित तरुणांनी केळवे पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये तक्रार देऊनही अद्याप गोसावी याच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असा तरुणांचा आरोप आहे. ( Kiran Gosavi Latest News )

वाचा: अनिल देशमुखांच्या घराची ९ तास झडती; अटक वॉरंटची चर्चा होती, पण…

एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी मुंबईजवळ समुद्रात कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकून हायप्रोफाइल ड्रग्ज पार्टी उधळली होती. या कारवाईत अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह काही उच्चभ्रू कुटुंबातील तरुण आणि तरुणींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान पंच साक्षीदार म्हणून हजर राहिलेले किरण गोसावी आणि भाजपचा कार्यकर्ता असलेला मनीष भानुशाली हे दोघे जण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या दोघांनी आरोपींना हाताळल्याने त्यावर मंत्री नवाब मलिक यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. त्यामुळे ही संपूर्ण कारवाईच चर्चेत असताना किरण गोसावी याच्याबाबत अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. गोसावी याच्यावर पुण्यातील तरुणाची फसवणूक केल्याची तक्रार आहे. त्या प्रकरणात दाखल गुन्ह्यात पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याशिवाय राज्यभरात एकूण चार एफआयआर त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. असे असतानाच आता पालघरमधील दोन तरुणांची त्याने २०१८ मध्ये फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

वाचा:…म्हणून आर्यन खानला मिळू शकला नाही जामीन

नेमकं काय आहे प्रकरण?

किरण गोसावी याने फेसबुकवर मलेशिया येथील नोकरीबाबत जाहीरात पोस्ट केली होती. ही जाहीरात पाहून पालघरमधील एडवण गावातील उत्कर्ष तरे आणि आदर्श किणी या तरुणांनी गोसावी याच्या नवी मुंबईतील कार्यालयात संपर्क साधला. त्यानंतर क्वालालंपूर येथील एका नामांकित हॉटेलमध्ये नोकरी देत असल्याचे सांगून त्याने दोघांकडून १ लाख ६५ हजार रुपये घेतले. हे पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात आले. त्यानंतर डिसेंबर २०१८ मध्ये दोघेही क्वालालंपूरला जाण्यासाठी रवाना झाले. दरम्यान, कोची विमानतळ येथे दोघांकडे असलेल्या तिकीट आणि व्हिसा फेक असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे दोघांच्याही लक्षात आले. त्यानंतर किरण गोसावी याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो फोन उचलत नव्हता. त्यामुळे पालघरला परतल्यानंतर दोघांनीही केळवे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली. मात्र, याप्रकरणी अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेले नाही, असे दोघांचेही म्हणणे आहे. ‘माझ्या आईवडिलांनी दागिने गहाण ठेवून मला पैसे दिले होते. मात्र, हे पैसे किरण गोसावी याने हडपले. माझ्याप्रमाणेच अनेक तरुणांची त्याने फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकायला हव्यात आणि कठोर कारवाई करायला हवी’, अशी मागणी उत्कर्ष तरे याने केली. केळवे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी याप्रकरणी तपास करून गोसावी याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवू असे म्हटले आहे. मी नोव्हेंबर २०२० मध्ये येथे रुजू झालो त्यामुळे एफआयआरसाठी नेमका विलंब का झाला हे सांगता येणार नसल्याचेही ते म्हणाले.

वाचा: आर्यन खानला पकडून आणणाऱ्या के. पी. गोसावीला पुणे पोलिस शोधतायत

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.