Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
या सेतूची निर्मिती कशी झाली याबाबत अनेक कारणे सांगितली जातात. पौराणिक मान्यतेनुसार, रावणाशी लढण्यासाठी भगवान राम आणि त्यांच्या सैन्यासह समुद्र ओलांडून लंकेत पोहोचले होते. तेव्हा या सेतूची प्रभू रामाच्या सैन्यांनी केली होती.
तर भूवैज्ञानिकांच्या मते आधी भारत आणि श्रीलंका यांना जोडणारी जमीन अस्तित्वात होती त्याचे अवशेष म्हणजे हा चुनखडीचा सेतू होय. हा नैसर्गिक सेतू 15व्या शतकापर्यंत प्रवासासाठी वापरला जायचा अश्या नोंदी देखील इतिहासात आढळतात. कालांतराने वादळांमुळे याची झीज होऊ लागली, असं ESA नं म्हटलं आहे.
युरोपियन स्पेस एजन्सीनं म्हटलं आहे की राम सेतूमधील काही वाळूची बेटं कोरडी आहेत आणि या भागात समुद्र उथळ आहे. इथल्या समुद्राची खोली 1 ते 10 मीटर इतकी आहे, जे पाण्याच्या हलक्या रंगावरून स्पष्ट होते.
मन्नार बेट पूल आणि रेल्वेमार्ग अश्या दोन्ही पद्धतीने श्रीलंकेशी जोडला गेला आहे. हे रॅम सेतूच्या दक्षिण भागाकडे पाहून कळते. भारतीय बाजूला अॅडम्स ब्रिज रामेश्वरम सोबत जोडलेला आहे. रामेश्वरम अर्थात पंबन बेटावर 2 किलोमीटर लांब पंबन ब्रिजवरून जाता येते. या बेटावर दोन मोठी शहरं आहेत. पश्चिम किनाऱ्यावर पंबन तर पंबनच्या पूर्वेला 10 किलोमीटरवर रामेश्वरम आहे.
अॅडम्स ब्रिजच्या दोन्ही बाजू दोन्ही नॅशनल पार्क घोषित केल्या आहेत. इथल्या वाळूच्या बेटांवर विविध पक्षांचा तसेच माश्यांचे वास्तव्य आहे. समुद्री गवताच्या अनेक प्रजाती देखील इथे आढळतात. तसेच राम सेतू जवळ डॉल्फिन, कासव, ड्यूगॉन्ग्स देखील आढळतात.