Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बाबाची गाडी निघाली, चरण स्पर्श करण्यासाठी लोक धावले अन् ११६ जीव गेले, हाथरसमध्ये काय घडलं?

8

लखनऊ: हाथरस येथील पुलराई गावात मंगळवारी दुपारी एक भयंकर दुर्घटना घडली. येथे भोले बाबा नावाच्या एका व्यक्तीच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरी झाली. यामध्ये ११६ जणांना आपला जीव गमवावा लागला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शेतात सत्संगसाठी मांडव घातलेला होता सत्संग संपल्यानंतर गुरुजी यांची कार निघाली आणि त्यांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी लोक धावले. यातच चेंगराचेंगरी झाली. अनेकजण खाली पडले, तर इतर लोक त्यांच्या अंगावर चढून पुढे गेले.

एका प्रत्यक्षदर्शी रामदासने सांगितलं की, तो आपल्या पत्नीच्या औषधांसाठी तिला घेऊन अलीगडला गेला होता. तिथून परत येत असताना ते वाटेत सत्संगमध्ये सहभागी झाले. ही व्यक्ती सेवा देणाऱ्यांजवळ बसली तर त्याची पत्नी सत्संगमध्ये गेली आणि त्यांची पत्नीही या चेंगराचेंगरीत अडकली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
Hathras Stampede : माझ्या पोरीची बॉडी काढायला मदत करा!!! भोवती मृतदेहांचा खच, माऊलीचा काळीज फाडणारा आक्रोश

अचानक मोठी गर्दी दिसली अन्…

मांडवापासून लांब बसलेले असताना अचानक खूप मोठी गर्दी दिसून आली. जवळपास दीड ते २ लाख लोकांची गर्दी होती. जिथे हा कार्यक्रम होता ते शेत ५०-६० एकरात पसरलेलं होतं. संपूर्ण रस्ता जाम होता. या व्यक्तीची पत्नी ही भोले बाबा यांना खूप मानत होती, अशीही माहिती या प्रत्यक्षदर्शीने दिली.

मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

याप्रकरणानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज हाथरसला येणार आहेत. मुख्यमंत्री हे सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. या घटनेच्या कारणांचा तपास करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आलं आहे. याचा अहवाल २४ तासाच्या आज देण्याच्या सूचना करण्यात आला आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना आवश्यक निर्देश दिलेत. तसेच, आरोपींवर कठोर कारवाईच्या सूचनाही दिल्या आहेत.

गृहमंत्र्यांकडून शोक व्यक्त

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही याप्रकरणाची दखल घेत योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली. तसेच, त्यांना केंद्राकडून हवी ती मदत देण्याचं आश्वासन देखील दिलं. तसेच, अमित शहा यांनी एक्सवर याबाबत दु:ख व्यक्त करत एक पोस्ट टाकली. यामध्ये त्यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला असून केंद्र सरकारकडून मदतीचं आश्वासन देण्यात आल्याचं सांगितलं.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.