Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नेमके काय घडले
बंगलोरच्या बनशंकरी भागात पती पत्नी राहत होते. दोघांना एक मुलगा सुद्धा आहे. पत्नीचे माहेर बाजूच्या इमारतीत होते. २६ जून रात्री चैतन्य आरती आणि मुलासह इमारतीच्या पार्कमध्ये फिरला नंतर त्याने पत्नी आणि मुलाला घरी सोडले आणि बाहेर जातो असे पत्नीला सांगून तो घराबाहेर पडला. बाहेर एका रेस्टॉरेंटमध्ये त्याने दारु घेतली आणि जेवण जेवला परत चैतन्य घरी येताच पत्नीने त्याला जेवणाचे ताट दिले. आरतीने माहेराहून जेवण आणले होते पण चैतन्य आधीच जेवल्याने त्याने जेवण करण्यास नकार दिला. आरतीने मग जेवण आवरुन आपल्या माहेराहून आणलेली सर्व भांडी आई वडिलांच्या घरी जात परत केली आणि परत ती घरी आली.
रात्री ११.३० वाजता आरतीचा राग अचानक अनावर झाला आणि तिने आंघोळीला जाण्याआधी चैतन्य वर ओरडायला सुरुवात केली. आरतीला मनात राग होता की नवरा आपण बनवलेले जेवण खात नाही पण त्याच्या आईच्या हातचे जेवण आवडीने खातो आणि भांडणात तिने याचा उल्लेख केला यावर चैतन्यने आपल्या आईला मध्ये भांडणात आणू नको असा आरतीला इशारा दिला. पण आरतीवर रागाचे भूत इतके चढले होते की तिने कैची हातात घेत सपासप नवऱ्यावर वार केले. चैतन्याने दरवाजा खोलून पळण्याचा प्रयत्न केला तर त्याचा पाठीत सुद्धा आरतीने कैची घुसवली. कसाबसा जीव वाचवत त्याने सासरवाडी गाठली, मग सासूने चैतन्यलाच ओरडत बायकोच्या विरोधात तक्रार करण्याचा सल्ला दिला. २८ जूनला चैतन्यने पोलीस स्थानकात बायको विरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दोघांना तपासासाठी बोलावले, दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केलेत. दोघांचे समुपदेशन करुन त्यांना घरी पाठवण्यात आले.