
Tej Police Times
मृग नक्षत्रात मान्सूनचा पाऊस अपक्षेप्रमाणे झाला नाही. पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट ओढवणार अशी शंका होती, मात्र मात्र मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. अधून मधून सुरु असलेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले. शिवाय शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीच संकट टळलं. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून पाऊस सुरु आहे. गुरवारी सकाळी देखील पावसाची रिपरिप सुरूच होती. जिल्ह्यातील १६ तालुक्यात पावसाने हजेरी लावली. सर्वाधिक पाऊस मुखेड तालुक्यात ४३.९० मिलिमिटर इतका पाऊस झाला तर सर्वाधिक कमी पाऊस माहूर मध्ये १४. ६० इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी दुपार २ वाजेपर्यंत पावस सुरूच होता.
Solapur News: वृद्धाश्रमात मयत झालेल्या वडिलांच्या मृतदेहाकडे मुलांची पाठ; बाप म्हणायला लाज वाटते;निष्ठुर मुलांचा निरोप
दरम्यान पावसामुळे सखल भागात काही प्रमाणात पाणी साचलं होतं. तर शेतीची कामे देखील खोळंबली होती. सतत सुरु असलेल्या पावसामुळे सोयाबीनचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नांदेड जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर केले आहे. नांदेड जिल्ह्यात अजूनही धो धो पाऊस झाला नसला तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्याने शहर वासियांचा पिण्यच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
नांदेड ( २६. २० टक्के मिलीमीटर ), बिलोली (३४. ०० ), मुखेड (४३. ९०), कंधार (३०. १०, लोहा (३२. २०), हदगांव (१८. ८०), भोकर (२२.६०), देगलूर (३२.२३), किनवट (२३. २०), मुदखेड (३४. ४०), हिमायतनगर (१७. ४०), माहूर ( १४. ६०), धर्माबाद (२६. ३०), उमरी (२९. ३०), अर्धापूर (२७. १०) आणि नायगाव (३२. ३०) मिलिमिटर इतका पाऊस झाला आहे.
Mumbai Rains Update: तानसा पाठोपाठ वैतरणा धरण भरले, मुंबईसह ठाण्यातील पाणी कपात मागे; अंबरनाथकरांची पाण्याची चिंता मिटली
नांदेड जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प असणाऱ्या शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प ८३ टक्के क्षमतेने भरला आहे, त्यामुळे कधीही बंधारराचा दरवाजा उघडला जाऊ शकतो.धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे. बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्ष्यात घेता विष्णुपुरी बंधाऱ्याचा दरवाजा कोणत्याही क्षणी उघडण्यात येईल, अशी सूचना पूर नियंत्रण अधिकारी यांनी केली आहे.दरम्यान विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेचे, जीवित्वाचे, पशुधनाचे,वीटभट्टी साहित्याचे नुकसान होणार नाही,यासाठी नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी केले आहे.
नांदेड शहराच्या उत्तर भागाला उधर्व पैनगंगा प्रकल्प तथा इसापूर धरणातूनही गरज पडल्यास पाणीपुरवठा केला जातो. या धरणातही २५ रोजीच्या सकाळच्या अहवालानुसार ४१.३५ टक्के पाणीसाठा आहे. भविष्यातील नांदेड शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तसेच धरणात अजून पाणीसाठ्याची गरज असून शेतीच्या सिंचनासाठी यात वाढ होणे गरजेचे आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.