Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महिन्याभरापुर्वीच व्यवसायाला सुरूवात, मात्र अपघातानं सारचं हिरावलं, एकुलता एक गेल्यानं कुटुंबाचा आक्रोश

9

निलेश पाटील, जळगाव: काही महिन्यांपूर्वीच नवीन व्यवसायाला सुरुवात झाल्याने परिवार आनंदित होता. मात्र भुसावळवरून जळगाव येथे येत असताना रस्त्यात निलगायला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचा अपघात झाला. या अपघातात एअर बॅग उघडल्याने जीव वाचला. मात्र पोटात रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
Buldhana Crime: मामीमुळे लग्न होत नाही, गैरसमजातून तरुणाचं धक्कादायक पाऊल अन् चिमुकल्यानं गमावला जीव, काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळकडून जळगावला येत असताना नशिराबादजवळ नीलगायला वाचविण्याच्या प्रयत्नात एक कारचा अपघात रविवारी २१ जुलै रोजी रात्री ११.३० वाजता झाला होता. या अपघातात एअरबॅग उघडल्याने कारमधील तिन्ही युवकाचा जीव वाचला होता. मात्र, अपघातात पोटाला दुखापत झाल्याने त्याकडे दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवशी पोटात रक्तस्त्राव झाला. यात युवकाचा उपचारादरम्यान बुधवारी २४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता नाशिक येथे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एकुलता एक मुलगा गेल्याने परिवारावर मोठा आघात झाला आहे.अविनाश कैलास पाटील (३०) असे मयत तरूणाचे नाव आहे. अविनाश आपल्या मित्रांसोबत रविवारी २१ जुलै रोजी सायंकाळी भुसावळकडे गेला होता. रात्री ११ वाजता जळगावकडे परत येत असताना नशिराबाद जवळील गैबनशाह पीर बाबा दर्ग्याजवळ रस्त्यालगत अचानक नील गाय आली. नील गायला वाचविण्याच्या प्रयत्नात कार उलटल्याने मोठा अपघात घडला. मात्र, एअरबॅग उघडल्याने कारमधील तिघांचा जीव वाचला होता. या अपघातादरम्यान अविनाशच्या पोटाला अंतर्गत दुखापत झाली होती. अविनाशने किरकोळ उपचार घेत त्या जखमेकडे दुर्लक्ष केले. मात्र, पोटात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी अविनाशची तब्येत बिघडली. त्याला जळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्याठिकाणाहून त्याला पुन्हा नाशिकला हलविण्यात आले.

मात्र बुधवारी २४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अविनाशने काही महिन्यांपुर्वी स्वत:चा व्यवसाय सुरु केला होता. अविनाशचे मुळ गाव धरणगाव तालुक्यातील सतखेडा असून, त्याचे वडील कैलास पाटील हे एसटी महामंडळात नोकरीला आहेत. अविनाशच्या पश्चात पत्नी, अडीच वर्षांचा मुलगा रिहान, विवाहित बहिण, आई, वडील असा परिवार आहे. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूमुळे परिवारावर मोठा आघात झाला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.