
Tej Police Times
सविस्तर माहिती अशी की, डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या रणकोळ आश्रमशाळेतील २८ विद्यार्थिनींना विषबाधा झाली. जेवणातून आणि पाण्यातून विषबाधा झाल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास उलटी आणि जुलाब सुरू झाल्याने २८ विद्यार्थिनींना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी विषबाधा झालेल्या विद्यार्थिनींना तपासून त्यांच्यावर औषधोपचार केले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
Nagpur News : महिला मृत्यूच्या दारात, गावकऱ्यांनी रुग्णालयात आणलं; डॉक्टर दारुच्या नशेत आणि…काय प्रकरण?
विद्यार्थिनींवर उपचार केलेल्या डॉक्टरांनी महाराष्ट्र टाइम्सला प्रतिक्रिया देताना सांगितले, “विषबाधा झालेले जवळपास २८ विद्यार्थिनी आमच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहेत. त्यातील ८ विद्यार्थिनींना आयपीडी करण्यात आले आहे तर उर्वरित २० विद्यार्थिनींना ओपीडीमध्ये ठेवण्यात आले आहे. ८ विद्यार्थिनींचे नुमने आपण तपासणीसाठी पाठवत आहोत. आम्ही सर्वांच्या प्राथमिक तपासण्या केल्या असून सगळ्यांचा रक्तदाब स्थिर आहे तरीही डॉक्टरांच्या निगराणीखाली आम्ही त्यांना ठेवले आहे.”
Jalgaon: चक्कर आली अन् आश्रमशाळेत ९ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, लेकाला पाहून आईने हंबरडा फोडला
दुसरीकडे मंगळवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील डहाणू विकास प्रकल्पातील १० आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे वृत्त समोर आले आहे. जिल्ह्यातील आश्रमशाळेतील एकूण २५० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारी सकाळच्या वृत्तानुसार २८ विद्यार्थ्यांवरच विषबाधा झाल्याचे वृत्त होते.
दरम्यान, प्रकल्प शाळेतील २५० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे वृत्त गंभीर असल्याने ‘महाराष्ट्र टाइम्स’ने अनेकदा प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
Recover your password.
A password will be e-mailed to you.