तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

प्रसुतीनंतर रक्तस्त्राव, रुग्णालयात जाताना ऑक्सिजन नसलेली रुग्णवाहिका, अपुऱ्या सुविधांमुळे महिलेचा बळी

0 34

मच्छिंद्र आगीवले, वाडा : वाडा तालुक्यातील मानिवली या गावात राहणाऱ्या एका महिलेचा सोमवारी पहाटे वाडा ग्रामीण रुग्णालयात प्रसुती दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. महिलेची नैसर्गिक प्रसुती झाली, मात्र त्यानंतर तिला सुरु झालेल्या रक्तस्त्रावामुळे पुढील उपचारासाठी ठाणे येथे जात असताना ही घटना घडली आहे. वाडा ग्रामीण रुग्णालयात असणाऱ्या तोकड्या सुविधा तसंच वाडा ते ठाणे हा अत्यंत खड्डेमय प्रवास आता रुग्णांच्या जीवावर बेतू लागला आहे.

प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू

सोनाली गणेश चौरे, या २३ वर्षीय महिलेला शनिवारी प्रसुतीच्या कळा येऊ लागल्याने वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सोमवारी पहाटे तिची प्रसुती होऊन एका गोंडस मुलीला तिने जन्म दिला. प्रसुतीनंतर काही वेळातच या महिलेला रक्तस्त्राव सुरू झाल्याने ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या यंत्रणेची भंबेरी उडाली. नेहमीप्रमाणे या महिलेला पुढील उपचारासाठी ठाणे येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला मात्र वाटेतच या महिलेचा मृत्यू झाला.
Nanded News : फोटो काढले, नंतर पोहण्यासाठी उतरले; पण पाण्याचा अंदाज चुकला आणि…नांदेडमध्ये घटनेने खळबळ
वाडा ग्रामीण रुग्णालय हे अवघ्या ३० खाटांच्या क्षमतेचं असून जवळपास अडीच लाख लोकांना आरोग्य सेवा देणारे एकमेव शासकिय रुग्णालय आहे. या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळूनही त्याबाबत अंमलबजावणीसाठी सरकारची उदासीनता असल्याने नेहमीच लोकांना जीव गमवावे लागतं आहेत. या घटनेची सखोल चौकशी करुन हा प्रकार नेमका कोणाच्या चुकीने घडला, त्याला कठोर शासन व्हावी अशी मागणी या महिलेचा पती गणेश चौरे यांनी केली आहे.
Sheikh Hasina : शेख हसीनांच्या हातून बांगलादेशातील सत्ता का निसटली? काय आहे चीन-पाकिस्तानची खेळी?

ऑक्सिजन नसलेली रुग्णवाहिका महिलेला दिली

ठाणे येथे जात असताना खरंतर ऑक्सिजन असलेली रुग्णवाहिका देणं गरजेचं होतं, मात्र तसं न केल्याने रस्त्यात महिलेला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने चार किमी अंतर कापून शिरीष पाडा येथून रुग्णवाहिकला पुन्हा माघारी यावं लागलं. नातेवाईकांनी ओरड केल्यावर ऑक्सिजन आणि स्वतः वैद्यकिय अधिकारी रुग्णवाहिकेत बसले, मात्र वाटेतच या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोनाली हिचा दोन वर्षांपूर्वी गणेश यासोबत विवाह झाला असून पहिल्याच प्रसुती दरम्यान अचानक कोसळलेल्या या संकटाने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घडलेला प्रकार निश्चितच दुदैवी असून सर्व प्रक्रिया नैसर्गिक आणि उत्तमरित्या पार पडूनही अचानक होऊ लागलेल्या रक्तस्त्रावामुळे या महिलेला ठाणे येथे पाठवणं गरजेचं झालं. या घटनेची चौकशी करुन जर कुणी यात दोषी असेल तर त्यावर नक्कीच कारवाई केली जाईल, असं ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ. यादव शेखरे यांनी सांगितलं.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.