Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Lord Shiva : महादेवासोबत असणाऱ्या ‘त्रिशुळ’ यामागे दडलाय गूढ अर्थ ! सदैव शिवशंकारासोबत का असते त्रिशुळ?

10

What does the Hindu Trisula mean :
त्रिशूळ हे भगवान शिवाचे प्रमुख अस्त्र आहे. त्रिशुळ म्हणजे भगवान शंकराची शक्ती शक्ती, अधिकार, पवित्रता आणि भगवान शिवाच्या शुभ कर्माचे प्रतीक आहे. त्रिशूलचे अनेक महत्त्व आहे. दुष्टांचा नाश करणारे आणि विश्वाचे रक्षण करणारे असे ही शिवाचे शस्त्र त्रिशुळ संदर्भात या लेखात जाणून घेऊया अधिक माहिती

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Lord Shiva : महादेवासोबत असणाऱ्या ‘त्रिशुळ’ मागे दडलाय गूढ अर्थ ! सदैव शिवशंकारासोबत का असते त्रिशुळ?
What is the power of Trishul :
अनेक देवांच्या हातात आपल्याला त्रिशुळ आपण बघितले असेल पण त्याची दिव्य शक्ती द्विगुणीत होते जेव्हा ते शंभो शंकराच्या हातात त्रिशुळ असते. त्रिशूळाकडे पाहिल्यावर तीन तीक्ष्ण टोक दिसतात. तसे पाहिले तर हे अस्त्र संहाराचे प्रतिक आहे. परंतू वास्तवात त्रिशूळामागे फार मोठा गूढ अर्थ दडला आहे. तुम्हाला तो अर्थ माहित आहे का? चला तर जाणून घेऊया

त्रिशुळाची उत्पत्ती कशी झाली?

भगवान शंकर यांना आपण भोलेनाथ म्हणतो कारण पटकन भक्तावर प्रसन्न होतात आणि त्याची मनोकामना पूर्ण करतात. भगवान शिवाची पूजा केली तर समस्यांपासून मुक्ती मिळते असे म्हणतात पण सदैव शंभोशंकर स्वतःसोबत त्रिशुळ का ठेवतात? असे म्हटले जाते की त्रिशूल हे भगवान शिवाच्या शक्तीचे प्रतीक आहे. वाईट शक्तींचा नाश करणारे शस्त्र म्हणून शिवशंकर नेहमी आपल्यासोबत त्रिशूळ ठेवतात.
समुद्रमंथनादरम्यान भगवान शिवाला भगवान विष्णूकडून त्रिशूळ भेट म्हणून मिळाले. त्याच वेळी, काही पौराणिक कथांमध्ये असेही सांगितले जाते की भगवान शिवाला देवी दुर्गाकडून त्रिशूळ मिळाले होते. महिषासुराविरुद्धच्या लढाईत त्यांनी त्रिशुळाचा उपयोग केला.

त्रिकालज्ञानी शंभोशंकर ​

त्रिनेत्र, त्रिपुंड्र, तीन पानांचा बेल त्याचप्रमाणे त्रिशुळाची तीन टोके अशा या शंभोशंकराला त्रिकालज्ञानी असे म्हणतात. त्रिशुळ म्हणजे फक्त तीन पाती नाहीत तर ते एक शिवशक्तीच्या ऊर्जेचे प्रतिक आहे. शिव ऊर्जा आणि तिला गती तसेच नियंत्रित करणारी शक्ती ही एकमेकांमध्ये अशा प्रकारे गुरफटलेल्या आहेत की त्याचा एक उत्तम उदाहरण म्हणजे त्रिशूळ !

त्रिशुळाबद्दल विष्णुपुराण काय सांगते?

विष्णुपुराणानुसार विश्वकर्मा यांनी त्रिशुळाची निर्मिती केली असे सांगितले जाते. याची एक पौराणिक कथा आहे. देवतांचे शिल्पकार विश्वकर्मा यांची कन्या संजनाचा विवाह सूर्य देवासोबत झाला होता. मात्र सुर्यदेवाच्या असीम तेजामुळे संजनाला त्यांच्याबरोबर राहणे अशक्य होत नव्हते. म्हणून काही काळानंतर तिने आपली छाया सूर्यदेव आणि पुत्रांजवळ सोडून ती तिथून निघून गेली.

जेव्हा सूर्योदय आणि विश्वकर्म्याला हे समजले तेव्हा दोघांनी मिळून उपाय शोधायचे ठरवले. विश्वकर्म्याने सूर्यदेवाला घासून त्याचं तेज थोडं कमी केलं जेणेकरून संजना विनाकष्ट त्याच्याबरोबर राहू शकेल. अशाप्रकारे सूर्यदेवाला घासून काढलेल्या तेजापासून विश्वकर्म्याने सुदर्शन चक्र, त्रिशूळ अशी दैवी शस्त्र विश्वकर्मा यांनी तयार केली. त्यांनी सुदर्शन चक्र भगवान विष्णूला तर त्रिशूळ भगवान महादेवांना भेट दिले.

त्रिशुळाची तीन टोके म्हणजे तीन शक्ती

शिवपुराणात असे म्हटले आहे की, संपूर्ण विश्वाच्या प्रारंभी भगवान शिव ब्रह्मनादातून प्रकट झाले. त्यांच्या सोबत तीन गुणही प्रकट झाले ते म्हणजे रज, तम आणि सत् गुण, या तीन गुणांनी मिळून शिवशूल तयार झाले, ज्यातून त्रिशूल निर्माण झाले. या जगात तीन प्रकारच्या प्रवृत्ती आहेत… सत, रज आणि तम. सत म्हणजे सत्यगुण, रज म्हणजे सांसारिक आणि तम म्हणजे तामसी अर्थात निशाचरी प्रवृत्ती. प्रत्येक माणसात या तिन्ही प्रवृत्ती आढळून येतात. फक्त या प्रवृत्तींचे प्रमाण प्रत्येकात वेगवेगळे असते.
त्रिशुळातील तीन टोक या तीन प्रवृत्तींचे प्रतिनिधीत्व करतात. त्रिशुळाची तीन टोके म्हणजे तीन शक्ती आहेत. ब्रह्मांडाचा विचार केला तर ब्रह्मा, विष्णू, महेश असे समजावे. प्रकृतीच्या दृष्टीने विचार केला तर निर्माण, जीवन आणि विनाश आहे. स्वर्गलोक, भूलोक आणि पाताळलोक असे त्रिलोक सांगितले जातात. आपण तीन काळ सुद्धा म्हणतो ते म्हणजे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ.
तीन शक्ती महागौरी, महालक्ष्मी, महासरस्वती, तीन नाड्या इडा, पिंगला, सुषुम्ना असे ही म्हणतात. मानवाला तीन दुःख त्रास देतात शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक. एकूणच शंकराच्या हातातील त्रिशुळ याच गोष्टी दर्शवित असते. म्हणून भगवान शिव आपल्याला संदेश देतात की, या तिन्ही गुणांवर आपले नियंत्रण आहे. हा त्रिशुळ तेव्हाच उचला जेव्हा कठीण परिस्थिती असेल. तेव्हा या तिन्ही गुणांचा आवश्यकतेनुसार वापर करा.

त्रिशुळावर का बांधलेले असते लाल वस्त्र?

तुम्ही पाहिलं असेल त्रिशुळावर नेहमी लाल वस्त्र बांधलेले असते. पुरणात त्यासंदर्भात एक कथा सांगितली जाते. एकदा मंगळ ग्रहाने भगवान शिवासाठी कठोर तपश्चर्या केली, ज्यामुळे भोलेनाथ प्रसन्न झाले. सदैव मला तुमच्यासोबत राहू दे असे वरदान मंगळ ग्रहाने मागितले. शंभोमहादेवाने सांगितले, ते कोणत्याही ग्रहाला सोबत ठेवू शकत नाही. ते ग्रहापासून दूर राहतात. पण मंगळ ग्रह ऐकायला तयार नव्हता आणि भगवान शंकर यांनी त्याला वरदान मागायला सांगितले होते. त्यांचा नकार ऐकल्यावर मंगळाने सांगतिले तुमचे एखादे चिन्ह जे तुमचे प्रतीक आहे तिथे मला जोडून घ्या. तेव्हा शिवाने त्याला त्रिशुळासोबत राहण्याचे वरदान दिले. तेव्हापासून त्रिशुळावार लाल रंगाचे वस्त्र बांधले जाते असे सांगतात.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.