Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुतण्या म्हणून कायम दुःख; त्या वक्तव्यानंतर काकांसाठी रोहित पवारांची भावनिक पोस्ट

7

पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघातून यंदाच्या नवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली होती. पण, बिहणीविरोधात पत्नीला उभं करायला नको होतं, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खंत व्यक्त केली. पार्लमेंट्री बोर्डाने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. एकदा बाण सुटल्यानंतर माघारी घेता येत नाही. मात्र माझं मन आज मला सांगतंय, की तसं नको व्हायला होतं, असं अजित पवारांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यावर आता पुतणे आणि शरद पवार गटाचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी काकांबाबत एक मोठा दावा केला आहे. तो निर्णय अजित पवारांचा असूच शकत नाही असं म्हणत रोहित पवारांनी दिल्लीकडे बोट दाखवलं.

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असाताना “बारामतीत तुमची कोणी लाडकी बहीण आहे का?”, असा सवाल अजित पवारांनी विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत ते म्हणाले की, “राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी, पण सगळ्याच माझ्या लाडक्या बहिणी आहेत. अनेक घरांत राजकारण चालतं. पण राजकारण हे घरात शिरु द्यायचं नसतं. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मात्र माझ्याकडून चूक झाली. मी माझ्या बहिणीविरोधात सुनेत्रा पवार यांना उभं करायला नको होतं. पार्लमेंट्री बोर्डकडून सुनेत्रांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता. बाण एकदा सुटला, की तो माघारी घेता येत नाही. मात्र आज माझं मन मला सांगतं, की तसं व्हायला नको होतं”. अजितदादांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती.
Ajit Pawar Confession : सुप्रियांविरुद्ध सुनेत्रांना उभं करायला नको होतं, अजित दादांची खंत, माझं मन मला सांगतंय…

रोहित पवार काय म्हणाले?

त्यानंतर आता रोहित पवार हे काकाच्या बाजूने बोलले. हा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती, असं रोहित पवार म्हणाले. त्यांनी सोशल मीडियावर त्याबाबतची एक पोस्ट शेअर केली.

“खासदार सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती. ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याची तुम्ही कबुली दिली, परंतु तुमचे मित्रपक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचे सांगतात. याला तुम्ही ‘चूक झाल्याचे नाव देत असलात’ तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता. आता विधानसभेला ‘असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची’ चर्चा आहे”.

“दबावाला बळी पडणे हा वैयक्तिक विषय असला तरी स्वाभिमान, विचारधारा आणि साहेबांना सोडून तुम्ही भाजपचं मांडलिकत्व स्वीकारलं आणि यामध्ये एक क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला, याचं मात्र पक्षाचा एक कार्यकर्ता आणि एक पुतण्या म्हणून कायम दुःख राहील. पण ही कटकारस्थाने करणाऱ्या तसंच महाराष्ट्र नासवणाऱ्या कलाकाराला मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेच्या सहकार्याने राज्याच्या राजकीय पटलावरून एक दिवस नक्की बाजूला सारेल, हा माझा तुम्हाला पक्का वादा आहे”, असं ते म्हणाले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.