Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

निवडणुकीसमोर शेतमालाच्या भावाचे मतआव्हान; ‘लाडकी बहीण’चा लाभ, पण पिकांच्या भावावर टांगती तलवार

5

Assembly Elections 2024 : लांबलेल्या निवडणुकीमुळे एकीकडे राज्य सरकारला फायदा होणार असल्याचे तर दुसरीकडे फटका बसणार असल्याचेही बोलले जात आहे.

महाराष्ट्र टाइम्स
Assembly Elections 2024
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जवळपास महिनाभर पुढे ढकलल्या गेल्यामुळे राज्य सरकारला ‘लाडकी बहीण योजना’, ‘आनंदाचा शिधा’, ‘पीएम किसान योजना’ आणि ‘नमो शेतकरी महा सन्मान योजना’ यांसारख्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील पात्र लाभार्थ्यांना हजारो कोटी रुपयांचे अधिकचे हप्ते देता येणार असल्याने मतदानावर त्याचा सकारात्मक फरक पडेल. मात्र त्याचवेळी चांगल्या पावसामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर कापूस, सोयाबीन यासारख्या शेतमालाची आवाक वाढल्याने बाजारभाव कोसळण्याची दाट शक्यता असून बाजारभाव कोसळल्यामुळे ऐन निवडणुकीत सरकारवरील शेतकऱ्यांचा रोष वाढण्याची भीती या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा आणि निवडणूक कार्यक्रम घोषित केला असून राज्यातील विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरऐवजी नोव्हेंबरमध्ये घेतल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लांबलेल्या निवडणुकीमुळे एकीकडे राज्य सरकारला फायदा होणार असल्याचे तर दुसरीकडे फटका बसणार असल्याचेही बोलले जात आहे.

लाडकी बहीण योजना

लाडकी बहीण योजनेला सध्या तरी विविध स्तरातील महिलांचा जोरदार प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. पात्रतेचे निकष शिथिल करण्यात आल्याने या योजनेमध्ये सुमारे अडीच कोटी महिला लाभार्थी पात्र होतील, असा अंदाज आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला या योजनेचा पहिल्या दोन महिन्यांचा म्हणजे एकूण तीन हजार रुपयांचा हप्ता सुमारे एक कोटी महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. दर दिवशी अशा प्रकारे पात्र महिलांच्या बँक खात्यात हे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून ऑगस्ट अखेर सुमारे दीड कोटी महिलांना हा लाभ हस्तांतरित केला जाईल असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. भविष्यकाळातही जसे पात्र लाभार्थी येत जातील तसे त्यांना पहिल्या दिवसापासूनचे हप्ते देण्यात येतील आणि एकूण अडीच कोटी महिलांना हे लाभ देण्यात येतील असे विभागाचे म्हणणे आहे. निवडणुका लांबल्यामुळे तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता जसा प्रत्यक्ष खात्यावर जमा झाला आहे त्याचप्रमाणे दिवाळीच्या पूर्वसंध्येला तीन हजार रुपयांचा दुसरा हप्ताही या महिलांच्या खात्यावर जमा करता येणे सहज शक्य होणार आहे. साहजिकच याचा राज्य सरकारला म्हणजेच महायुतीला निवडणूकीमध्ये फायदा होण्याचीच चिन्हे आहेत.

आनंदाचा शिधा योजना

या योजनेत रेशन दुकानांवरील पात्र लाभार्थ्यांना विशेष बाब म्हणून रवा साखर तूप चणा डाळ यासारख्या सणासुदीला लागणाऱ्या खाद्यपदार्थांचे एक पॅकेज देण्यात येते. सध्या या योजनेमध्ये विविध शासन निर्णयाद्वारे एकूण अडीच कोटी लाभार्थी लाभासाठी पात्र करण्यात आलेले आहे. त्यानुसार सध्या आगामी गणेशोत्सव वगैरे लक्षात घेऊन सध्या एक वितरण होईल असे नियोजन करण्यात आलेले आहे. निवडणुका लांबणीवर पडल्याने नवरात्र, दसरा आणि दिवाळीनिमित्त आणखी एकदा अडीच कोटी लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत पॅकेज देता येणार असून यासर्व लाभार्थीचा फायदा मतदानाच्या माध्यमातून महायुतीचा मिळेल असा अंदाज आहे.

पी एम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान योजना

या योजनांतर्गत प्रत्येकी सहा हजार रुपये असून एकूण १२ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. या योजनेतील पात्र लाभार्थींची संख्या ९१ लाखांपर्यंत पोहोचलेली आहे. या सर्व लाभार्थ्यांना या महिन्यात नमो शेतकरी महासन्मान योजनेचा एक हप्ता तसेच निवडणुका लांबीवर पडल्यास दिवाळीपूर्वी दुसरा एक दोन हजार रुपयांचा हप्ता अतिरिक्त देता येणार आहे. त्यामुळे निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे ९१ लक्ष लाभार्थ्यांना अधिकचा हप्ता मिळून निवडणुकीत त्याचा फायदा होणार आहे.

Kamathipura Mhada : कामाठीपुराचा चेहरा-मोहरा बदलणार, म्हाडा उभारणार ५८ आणि ७८ मजली इमारती; कशी आहे योजना?
पिकांचे भाव घसरले

राज्यात चालू वर्षी खरीप हंगाम चांगल्या पावसामुळे जोरात आहे. साधारणतः ५० लाख हेक्टरवर सोयाबीन, ४२ लाख हेक्टर वर कापूस असा पीक पेरा झालेला असून एकूण पिकाखालील क्षेत्राच्या ७० ते ७५ टक्के क्षेत्र या पिकाखाली आहे. कापूस व सोयाबीन या पिकांचे भाव पडल्यामुळे लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मोठा फटका बसला होता. आता कापसाचे आणि सोयाबीनचे दर आणखी खाली गेले आहेत. त्यातच ऑक्टोबरच्या मध्यापासून कापूस वेचणी व सोयाबीन काढणीला सुरुवात होते. ती नोव्हेंबरच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू असते. त्या कालावधीत बाजारात मोठ्या प्रमाणावर शेतमालाची आवक झाल्यामुळे बाजारभाव आणखी कोसळण्याचीच अधिक भीती व्यक्त केली जात आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.