
Tej Police Times
कॉंग्रेसचे नेते तथा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?’ या टॅगलाइनखाली आपल्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ अपलोड केला. या व्हिडीओने वादंग उभे केले.
सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय हे ब्रीद अंगीकारणारी पोलिस यंत्रणा जतनेच्या सुरक्षेसाठी आहे की आमदाराच्या गाड्या धुण्यासाठी? असा खोचक सवाल करणाऱ्या ओळी हर्षवर्धन सपकाळ यांनी त्या व्हिडीओखाली लिहिल्या. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना असल्याचे त्यांनी नमूद केले. याच व्हिडीओला उद्देशून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची काय दुर्दशा करून ठेवली, अशी टीका केली. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ अपलोड केला. गृहमंत्री एवढे निष्क्रिय आहेत की पोलिसांवर सत्ताधारी आमदाराची गाडी धुण्याची वेळ आली, असा सवालही दानवेंनी केला.
विरोधकांनी टीका करण्याआधी वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे, असा सल्ला देत या व्हिडीओबद्दल बोलताना आमदार संजय गायकवाड म्हणाले, आज सकाळी ड्युटीवर आलेल्या सुरक्षा रक्षकांनी धाड नाक्यावर नाश्ता केला होता. त्यांना अस्वस्थ वाटले आणि त्यांनी गाडीतच उलट्या केल्या. बाहेरूनही वाहनावर घाण पडली. गाडीमध्ये उलटी केल्याने चालक व त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे सुरक्षा रक्षकाने स्वत:च पाण्याने गाडी धुवून काढली. एक पोलीस कर्मचारी म्हणून गाडी धुतली नाही. भरलेली गाडी स्वच्छ करून कर्मचाऱ्याने उलट मानवतावादी दृष्टीकोन दाखविल्याचेही गायकवाड म्हणाले.
संबंधित सुरक्षा रक्षकाशी संपर्क केला असता तो म्हणाला, २८ ऑगस्ट रोजी शेगाव कोर्टात माझी तारीख होती. आज सकाळी ड्युटीवर मला अस्वस्थ होऊन उलटी झाली. साइडला घाण उडाली. वाहन भरल्याचे चांगले न वाटल्याने आपण स्वत:हून वाहन स्वच्छ केले.
लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.