
Tej Police Times
भैय्याजी काणे यांच्या कार्याचे स्मरण करून भागवत म्हणाले, “आपण आपल्या जीवनात जास्तीत जास्त चांगले काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणीही असे म्हणत नाही की आपण चमकू नये किंवा वेगळे दिसू नये. प्रत्येकजण आपल्या कामातून आदरणीय व्यक्ती बनू शकते, परंतु आपण त्या स्तरावर पोहोचलो आहोत की नाही हे आपण स्वत: ठरवू शकत नाही तर ते इतरांनी ठरवावे. आपण याची घोषणा करु शकत नाही की आपण देव झालो आहे”, असं मोहन भागवत म्हणाले.
Ladki Bahin Yojana:‘लाडकी बहीण’वरून शिवसेना-NCPत वाद, शिंदेंच्या मंत्र्यांना कानपिचक्या, फडणवीसांचे मध्यस्थीचे प्रयत्न
मणिपूरमधील परिस्थितीबाबत बोलताना संघ प्रमुखांनी चिंता व्यक्त केली. संघाचे स्वयंसेवकांनी मणिपूर सोडले नाही, तसेच काही करत नाहीये असंही नाही, यावर भागवत यांनी भर दिला. ते मणिपूरची स्थिती सामान्य करण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढवण्यासाठी दोन गटांमधील तणाव कमी करण्यासाठी सक्रियपणे कार्य करत आहेत.
Mohan Bhagwat: देव झालो असं स्वतः म्हणू नये, मोहन भागवतांनी कान टोचले, कोणाकडे इशारा?
तिथे सुरक्षेची कोणतीही हमी नाही. स्थानिक लोकांमध्ये त्यांच्या सुरक्षेबाबत साशंकता आहे. जे लोक तेथे व्यवसाय किंवा सामाजिक कार्यासाठी गेले आहेत त्यांच्यासाठी परिस्थिती आणखी आव्हानात्मक आहे. परंतु अशा परिस्थितीतही संघाचे स्वयंसेवक तैनात आहेत. आम्ही दोन्ही गटांना सेवा देत आहोत आणि परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत आहोत, असंही मोहन भागवत म्हणाले.
लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.