Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Mohan Bhagwat: देव झालो असं स्वतः म्हणू नये, मोहन भागवतांनी कान टोचले, कोणाकडे इशारा?

8

RSS Chief Mohan Bhagwat News: मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना सांगितलं की, कुणीही स्वत:ला देव असल्याचं घोषित करु शकत नाही. यावेळी त्यांचा नेमका इशारा कोणाकडे होता?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मोहन भागवत
नागपूर: आपल्या कार्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला देव मानायचं की नाही, हे ती व्यक्ती ठरवू शकत नाही, हे लोक ठरवतात, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत म्हणाले आहेत. ते गुरुवारी (५ सप्टेंबर) शंकर दिनकर काणे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. शंकर दिनकर यांनी १९७१ पर्यंत मणिपूरमध्ये काम करून मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले आणि विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणून त्यांची राहण्याची व्यवस्था केली, असंही ते म्हणाले.

आपण जास्तीत जास्त चांगली कामं करायला हवी, पण आपण देव आहोत याची घोषणा आपण करु नये – भागवत

भैय्याजी काणे यांच्या कार्याचे स्मरण करून भागवत म्हणाले, “आपण आपल्या जीवनात जास्तीत जास्त चांगले काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणीही असे म्हणत नाही की आपण चमकू नये किंवा वेगळे दिसू नये. प्रत्येकजण आपल्या कामातून आदरणीय व्यक्ती बनू शकते, परंतु आपण त्या स्तरावर पोहोचलो आहोत की नाही हे आपण स्वत: ठरवू शकत नाही तर ते इतरांनी ठरवावे. आपण याची घोषणा करु शकत नाही की आपण देव झालो आहे”, असं मोहन भागवत म्हणाले.
Ladki Bahin Yojana:‘लाडकी बहीण’वरून शिवसेना-NCPत वाद, शिंदेंच्या मंत्र्यांना कानपिचक्या, फडणवीसांचे मध्यस्थीचे प्रयत्न

मणिपूरमधील परिस्थितीबाबत भागवतांकडून चिंता व्यक्त

मणिपूरमधील परिस्थितीबाबत बोलताना संघ प्रमुखांनी चिंता व्यक्त केली. संघाचे स्वयंसेवकांनी मणिपूर सोडले नाही, तसेच काही करत नाहीये असंही नाही, यावर भागवत यांनी भर दिला. ते मणिपूरची स्थिती सामान्य करण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढवण्यासाठी दोन गटांमधील तणाव कमी करण्यासाठी सक्रियपणे कार्य करत आहेत.

Mohan Bhagwat: देव झालो असं स्वतः म्हणू नये, मोहन भागवतांनी कान टोचले, कोणाकडे इशारा?

तिथे सुरक्षेची कोणतीही हमी नाही. स्थानिक लोकांमध्ये त्यांच्या सुरक्षेबाबत साशंकता आहे. जे लोक तेथे व्यवसाय किंवा सामाजिक कार्यासाठी गेले आहेत त्यांच्यासाठी परिस्थिती आणखी आव्हानात्मक आहे. परंतु अशा परिस्थितीतही संघाचे स्वयंसेवक तैनात आहेत. आम्ही दोन्ही गटांना सेवा देत आहोत आणि परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत आहोत, असंही मोहन भागवत म्हणाले.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.