Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राज्यात मराठ्यांच्या पाठिंब्याशिवाय कुणाचीच सत्ता नाही; मनोज जरांगे यांचं वक्तव्य

6

Manoj Jarange On Vidhan Sabha: मराठा समाजाच्या हिताचाच निर्णय आपण वेळेवर घेणार आहोत. आता येत्या ३० तारखेपर्यंत कुणीच अंतरवाली सराटीत येऊ नये,’ असे प्रतिपादन मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी केले.

महाराष्ट्र टाइम्स
Manoj Jarange Patil OG.

म. टा. प्रतिनिधी, जालना : ‘विधानसभेवर कुणाला पाठवायचे यासंदर्भात मराठा समाजाच्या हिताचाच निर्णय आपण वेळेवर घेणार आहोत. आता येत्या ३० तारखेपर्यंत कुणीच अंतरवाली सराटीत येऊ नये,’ असे प्रतिपादन मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी केले.

मराठा समाजाच्या पाठिंब्याशिवाय महाराष्ट्रात कुणीच सत्तेवर येऊ शकत नाहीत. सध्या सगळेच राजकीय पक्ष आणि नेते रोज अंतरवाली सराटीत येऊन मराठा समाजाच्या पायावर डोके ठेवत आहेत. हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे हे आता तरी लक्षात घ्या, नाहीतर सुपडा साफ होईल, असा इशाराही जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथील पत्रकार परिषदेद्वारे दिला.

देवेंद्र फडणवीसांनी केंद्रातील भाजपच्या नेत्यांना फसवले, त्यांनी त्या नेत्यांना सगळी खोटी माहिती दिली. राज्यात भाजप संपेल तर फक्त फडणवीस यांच्याचमुळे. भाजपसोबत त्यांनी ‘आरएसएस’ संपवले आहे. ज्यांना फडणवीस यांनी भाजपचे तिकीट दिले नाही ते भाजपचे नेते रात्री दोननंतर अंतरवाली सराटीत येऊन बसायचे, आता दिवसभर येत आहेत, असेही जरांगे-पाटील म्हणाले.
राजकारणाच्या मोहावर पुत्रप्रेम भारी; काटोलमध्ये अनिल देशमुखांची माघार, मुलगा सलील लढणार
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जरांगे यांची भेट घेतली. त्यानंतर ते म्हणाले, की जरांगे-पाटील हे आमचे जुने मित्र आहेत. अंतरवाली सराटीत गोळीबार झाल्यापासून आपण नेहमीच त्यांना भेटावयास येतो, भेटण्यात काही वावगे नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे गेल्या अनेक महिन्यांपासून अंतरवाली सराटीत मुक्काम ठोकून आहेत, यासंदर्भातील प्रश्नाला शिरसाट यांनी काहीच उत्तर दिले नाही.
‘रिपाइं’चा महायुतीवर बहिष्कार; विधानसभा निवडणुकीत जागा सोडल्या नसल्यामुळे ठराव
स्वत:च करणार घोषणा?
दरम्यान, छत्रपती संभाजीराजे यांनी मनोज जरांगे-पाटील यांना स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून मराठा समाजातील उमेदवार उभे करण्याच्या केलेल्या आवाहनास जरांगे-पाटील यांच्याकडून प्रतिसाद नसल्याचे सांगण्यात येत आहे .जरांगे हे सर्व उमेदवार स्वतःच निवडून उभे करणार असून, त्याची घोषणा ते तीस अथवा एक तारखेला करणार आहेत, असे सांगण्यात आले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.