तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Rahul Gandhi: व्यासपीठावर जागा नाही, राहुल गांधींच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांची पाठ

0 42

Samvidhan Samman Sammelan Nagpur: नागपुरात राहुल गांधी यांच्या उपस्थितीत संविधान सन्मान संमेलन कार्यक्रम पार पडला. मात्र, यावेळी ओबीसी समाजातील विविध संघटनांनी या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळालं. त्यांना व्यासपीठावर जागा न मिळाल्याने रोष व्यक्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्र टाइम्स

नागपूर: राहुल गांधी हे सध्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत लक्ष घालून आहेत. त्यासाठी त्यांनी नागपुरात संविधान सन्मान संमेलनातही भाग घेतला. मात्र, यावेळी विदर्भातील ओबीसी समाजातील प्रमुख संघटनांना मानाचे स्थान न दिल्यामुळे संघटनांच्या वतीने असंतोष व्यक्त करण्यात आला आहे. कविवर्य सुरेश भट सभागृहात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत संविधान सन्मान संमेलन पार पडलं. यावेळी ओबीसी समाजातील विविध संघटनांनी या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष केले असून, त्यांना व्यासपीठावर जागा न मिळाल्याने रोष व्यक्त करण्यात आला. त्यानंतर, हा कार्यक्रम संविधानाच्या सन्मानासाठी नसून तर निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन केला, असा आरोप भाजपाने काँग्रेसवर केला आहे.

या संमेलनाची जबाबदारी विरोधी पक्ष नेते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी घेतली होती. मात्र, यावेळी इतर संघटनांच्या नेत्यांचा डावलण्यात आल्याने अकेन संघटनांचे कार्यकर्ते नाराज झाले होते. काही संघटनांनी तर या संमेलनावरच बहिष्कार टाकला. तसेच, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनीही संमेलनात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना या संमेलनासाठी गर्दी जमवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, जेव्हा भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन ‘लाल पुस्तिका’ दाखवली, तेव्हा त्यांना फार कमी प्रतिसाद मिळाला. त्यावरुन राहुल गांधी यांनी आयोजकांची कानउघडणी केल्याची चर्चा कार्यक्रमाला उपस्थित असेलेल्यांमध्ये सुरु होती.

या कार्यक्रमात महिलांच्या हक्कासाठी घोषणा देण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्षात महिलांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही. त्यामुळे उपस्थितांमधून नाराजीचा सूर उमटला. काही महिला कार्यकर्त्यांना व्यासपीठावर बोलावून पुन्ह खाली बसवण्यात आलं. त्यावर महिलांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनीही आक्षेप घेतला आहे. “महिलांवर अन्याय करून, घोषणा देण्याचा हा कुठला न्याय?”, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तर, महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांनाही या कार्यक्रमाची चाहूल लागल्यामुळे ते अलिप्त राहिले, अशीही चर्चा होती.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.