
Tej Police Times
पश्चिम घाटातून उगम पावणारी आणि पिंपरी-चिंचवडमधून सुमारे २४ किलोमीटर अंतर पार करणारी पचना नदी जलप्रदूषणाच्या शिखरावर पोहोचली आहे. या नदीतील माशांच्या अनेक प्रजाती लुप्त झाल्या आहेत. नदीपात्रात सांडपाणी, अनेक कंपन्यांचे घातक रसायनयुक्त पाणी थेट सोडल्यामुळे गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नदीच्या विषारी पाण्यावर मृत मासे वारंवार तरंगताना दिसून येतात. नदीपात्रात अळ्यांचे साम्राज्य असून, डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे डेंगी, मलेरियाचे रुग्ण वाढले आहेत. अनेक घाटांवर निर्माल्यकुंडांचा अभाव असल्यामुळे नागरिक कचरा, निर्माल्य आणि प्लास्टिक सर्रास नदीत फेकून देत असल्याचे निदर्शनास आले आहे.
प्रश्न आश्वासनांच्या गर्तेत महापालिकेतर्फे दर वर्षी पर्यावरण सद्यस्थिती अहवाल सादर करण्यात येतो. त्यामध्ये नदी प्रदूषणावर चिंता व्यक्त करण्यात येते. अहवाल तयार करूनही प्रत्यक्षात कार्यवाहीला मुहूर्त मिळत नाही; किंबहुना निधी उपलब्ध नाही अशी सारवासारव केली जाते. ‘राज्य आणि केंद्र सरकारकडे आराखडा पाठविला आहे. शाश्वत सेलच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जात आहेत,’ अशी आश्वासनेही देण्यात येतात. मात्र, पवनेची बिकट वाट कधी सुकर होणार, याचे उत्तर प्रशासनाकडे नाही याबाबत पर्यावरणप्रेमी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. पवना नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, संसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढत आहे. या गंभीर परिस्थितीकडे महापालिकेसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचेही दुर्लक्ष झाले आहे. या संदर्भात पर्यावरणप्रेमींनीही कायम आवाज उठवला असून, त्यांनी दिलेल्या निवेदनांना प्रशासन आणि अधिकाऱ्यांनी कायम कचऱ्याची कुंडली दाखविल्याची हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आता तरी संबंधितांनी आणि महापालिकेने नदीची दुरवस्था दूर करावी, अशी विनंती नागरिक करीत आहेत.
जलप्रदूषण करणारे मोकाटच
‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’ च्या अधिकाऱ्यांना अनेकदा नदीच्या सर्वेक्षणासाठी बोलविण्यात आले. त्यांनी चाचणीसाठी पाण्याचे नमुने नेले; तरीही ठोस उपाययोजना राबविण्यात आली नाही, ही दुर्दैवाची बाब आहे,’ असे ‘वल्र्ड फॉर नेचर ने म्हटले आहे. ‘थेरगाव सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून नावेत बसून सर्वेक्षण करण्यात आले. दूषित पाणी मिसळणारी ठिकाणे निदर्शनास आणून दिली; तरीही कार्यवाही होत नसल्याबद्दल संस्थेने आश्चर्य व्यक्त केले आहे. जलप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत नसल्याबद्दल खेद व्यक्त करण्यात आला आहे.
चलो पंढरपूर…! कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूरसाठी धावणार ‘या’ स्पेशल ट्रेन्स, असे आहे वेळापत्रक
जलप्रदूषणाचे परिणाम
दुषित पाण्यामुळे संक्रमित रोगांचा प्रसार
साठलेल्या पाण्यातील जीवाणु, विषाणूंचा वाढता धोकर
प्राणवायूच्या कमतरतेमुळे जलचर धोक्यात.
प्रदूषित पाण्यामुळे वनस्पतीवर परिणाम
तेलकट पदाथांमुळे प्रकाश संश्लेषण पक्रिया संहासने
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार पवना नदी सुधारणा प्रकल्पाचा सुधारित अहवाल तयार करून पाठविला आहे. शहराची पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी महापालिकेने शाश्वत विकास सेलची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन आणि जल प्रदूषण यांबाबत विशेष नियोजन करण्यात येत आहे. – संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पर्यावरण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका
निष्काळजीपणामुळे पवना नदीची अवस्था बिकट असून, जैवसाखळी धोक्यात आली आहे. शहराच्या जैवविविधतेकडे गांभीर्याने न पाहिल्याने अनेक जलचर लुप्त झाले आहेत. हा विषय गांभीर्याने हाती घेऊन ताबडतोब तोडगा काढावा; अन्यथा काही वर्षांतच परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. –शुभम पांडे, संस्थापक, अध्यक्ष, ‘वर्ल्ड फॉर नेचर’
लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.