
Tej Police Times
हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला ऋतुमानानुसार महत्व आहे आणि त्यामागे काही धार्मिक आणि नैसर्गिक कारणं देखील आहेत. हा दिवस आणि रात्र हिवाळ्यातील सर्वात थंड आणि खूप मोठी असते. त्यामुळे या मोठ्या रात्रीच्या काळोखाला निरोप देण्यासाठी या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात अशी मान्यता आहे.
काळ्या रंगाची वस्त्रे ही बाहेरची ऊष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला म्हणजेच मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा आहे. दिनमान वाढत जाण्याच्या आनंदाप्रीत्यर्थ पतंग उडवण्याची प्रथा आहे. थंडीच्या दिवसांत तीळ हे शरीराच्या आरोग्याला उपयुक्त असतात. वर्षभरात कुणाशी मतभेद, भांडणे झाली असतील, अबोला धरला गेला असेल; तर तिळगूळ देऊन हितसंबंध सुधारावेत आणि तिळगूळ घ्या गोड गोड बोला असा निरोप द्यावा.
नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी व हलव्याचे दागिने भेट दिली जातात. बाळाच्या पहिल्या संक्रांतीनिमित्त त्यालाही काळ्या रंगाचे कपडे व हलव्याचे दागिने घातले जातात. त्यामुळं या वस्तूंची खरेदी संक्रातीला प्रामुख्याने केली जाते. हलव्याचे तयार दागिनेही बाजारात उपलब्ध असून त्यात हार, नेकलेस, कानातले, बिंदी, बांगड्या, कंबरपट्टा, बाजूबंद, मंगळसूत्र, कानाचे वेल, मुकूट असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. याशिवाय आपल्या मागणीनुसार दागिने तयार करुन दिले जात आहेत.
Next Post
Recover your password.
A password will be e-mailed to you.