Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Ramdas Navami 2023 : श्रीरामदास नवमी, आजही मार्गदर्शक ठरणाऱ्या समर्थांच्या चरित्राचा अगदी थोडक्यात आढावा

9

माघ वद्य नवमीला रामदास स्वामी समाधीस्त झाले. म्हणून या तिथीला रामदास नवमी असे संबोधले जाते. परमार्थ, अध्यात्म, श्रीराम व श्रीहनुमान भक्ती आणि संपूर्ण समाजाचा ‘नेटका प्रपंच’ या सर्वच बाबतीत स्वतः अत्युच्च स्थान गाठून समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या आजही मार्गदर्शक ठरणाऱ्या समर्थांनी माघ वद्य नवमी शके १६०३ (सन १६८१) सज्जनगडावर देह ठेवला. हा दिवस सर्वत्र ‘ दास नवमी ‘ म्हणून साजरा केला जातो. बलोपासनाचे समर्थक, मनाचे श्लोक, दासबोध यातून प्रापंचिक ज्ञान आणि परमार्थिक मार्गाची दिशा देणाऱ्या रामदास स्वामींच्या चरित्राचा अगदी थोडक्यात आढावा….

सूर्यनारायणाने दिलेल्या वरदानामुळे झाला जन्म

समर्थ रामदास स्वामींच्या वडील सूर्याजीपंत ठोसर निस्सीम सूर्योपासक होते. गंगाधर व नारायण या दोन पुत्रांचा जन्म सूर्यनारायणाने दिलेल्या वरदानामुळे झाला, अशी त्यांची श्रद्धा होती. समर्थ रामदास स्वामींचा जन्म रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस झाला. नारायण लहानपणापासूनच अतिशय बुद्धिमान, निश्चयी तसेच खोडकरही होता. हाती घेतलेले काम तडीस न्यावयाचे, असा त्याचा बाणा असायचा. नारायणाने मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या-त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. निरीक्षणाने आणि अनुभवाने तो सगळ्या गोष्टी शिकला. रामदास स्वामींच्या बालपणाची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एकदा नारायण लपून बसला. काही केल्या सापडेना. अखेर एका फडताळात सापडला. काय करीत होता, असे विचारल्यावर, आई, चिंता करितो विश्वाची, असे उत्तर त्याने दिले होते.

पंचवटी येथे जाऊन रामाचे दर्शन घेतले

पंचवटी येथे जाऊन रामाचे दर्शन घेतले

या मुलाचा विवाह करण्याचा घाट कुटुंबियांनी घातला. मात्र, बोहोल्यावर उभे असताना सावधान शब्द ऐकताच ते नेसत्या वस्त्रानिशी मंडपातून पळून गेले. यानंतर त्यांनी पंचवटी येथे जाऊन रामाचे दर्शन घेतले आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली. विद्यार्थ्याची दिनचर्या कशी असावी, याचा एक आदर्शच समर्थांनी त्याकाळी प्रस्थापित केला. पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून ते दररोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत. रामदासांनी रामनामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर अवतार कार्याला आरंभ केला, असे सांगितले जाते. १२ वर्षाच्या या तीव्र तपश्चर्येनंतर यांना आत्मसाक्षात्कार झाला, असे म्हणतात. तपश्चर्या संपल्यानंतर समर्थांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले. सारा हिंदुस्थान पालथा घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले.

श्रीरामदास स्वामी यांचे जीवनकार्य

श्रीरामदास स्वामी यांचे जीवनकार्य

वयाच्या ३६व्या वर्षी रामदासस्वामी महाराष्ट्रात परत आले. समर्थांच्या शिष्य मंडळींमध्ये सर्व प्रकारचे शिष्य होते. रामदास स्वामींची उपदेशाची भाषा अत्यंत साधी व सोपी होती. १२ वर्षाच्या प्रवासांत रामदास स्वामींनी जे पाहिले, ते भयंकर होते. सर्वस्वी नि:सत्त्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजास परमार्थाचा उपदेश हानिकारकच ठरेल. समाजाला प्रथम संघटित आणि शक्तिसंपन्न बनविले पाहिजे, समाजाचा आत्मविश्वास पुन्हा जागृत केला पाहिजे, अशी त्यांची खात्री झाली. तेव्हा रामदास स्वामींनी आपले बाहू उभारून खणखणीत वाणीने लोकांना उपदेश केला. विविध विषयांतून लीलया समाजप्रबोधन करणारे रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याने भारावून गेले. छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थांनी सर्वतोपरी मदत केली.

​समर्थांचे साहित्य व काव्यनिर्मिती

​समर्थांचे साहित्य व काव्यनिर्मिती

समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी अफाट, विपुल वाङ्‌मय निर्मिती केली. दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, भीमरूपी स्तोत्र,अनेक आरत्या उदाहरणार्थ, सुखकर्ता दुखहर्ता, ही गणपतीची आरती, लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा, ही शंकराची आरती, अशा त्यांच्या लेखनकृती प्रसिद्ध आहेत. याशिवाय रामायणांतील किष्किंधा, सुंदर व युद्ध ही कांडे, अनेकविध अभंग, आरत्या, भूपाळ्या, पदे, स्तोत्रे, राज-धर्म, क्षात्र-धर्म, शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांस पत्रे, आपल्या शिष्यांना मार्गदर्शन, मठ आणि त्यांतील उत्सव यांसंबंधी मार्गदर्शन, आत्माराम, अन्वय-व्यतिरेक, वैराग्य-शतक, ज्ञान-शतक, उपदेश-शतक, षड्‌रिपु-विवेक आदी विषयांवरील विपुल लेखन समर्थांनी केले आहे. समृद्ध शब्दरचना, मराठी शब्दांची वैभवशाली उधळण, तर्कशुद्ध विचारांची रेखीव व नेटकी मांडणी आणि माणसाच्या जीवनाचे, अगदी छोट्या-छोट्या व्यवहारांचे सूक्ष्म निरीक्षण ही समर्थांच्या लेखनाची काही वैशिष्ट्ये सांगता येतील.

शिवाजी महाराजांचा काळ

शिवाजी महाराजांचा काळ

समर्थांनी शिवाजी महाराजांच्या काळात समर्थसंप्रदाय स्थापन करून १,१०० मठ स्थापन केले. सुमारे १,४०० तरुण मुलांना समर्थ संप्रदायाची दीक्षा दिली. सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थांनी स्थापलेले राम मंदिर आणि अकरा मारुतींची देवळे याच परिसरात आहेत. माघ वद्य नवमीला तीन वेळा ‘जय जय रघुवीर समर्थ ‘ हा घोष करून समर्थ रामदास स्वामी समाधीस्त झाले. हीच तिथी पुढे श्रीरामदास नवमी म्हणून प्रसिद्ध झाली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.