
Tej Police Times
पुणे,दि.२६ :- काही दिवसा पासून पुण्यातील पाषाण परिसरातील संध्यानगर येथील भागांतील बोरिंगच्या नळांच्या पाण्यातून थेट गटारीचे पाणी येत असल्याने महिला त्रस्त आहे. त्यामुळे अनेक महिलांना सकाळी ४ ते ७ पंयंत पिण्यासाठी व आंघोळीसाठी इतर वापरासाठी नळाच्या पाणी भरावे लागते पाणीपुरवठा विभागाने या भागातील पाण्याचे नमुने गोळा केले असले तरी ऐन पावसाळा सुरू होण्यापूर्वी आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जुनी डिरनीस लाईन आहे व तुंबल्याने डिरनीस सांड पाणी लिकेज होऊन पाणी जमिनीत जिरपत आहे व तेच पाणी या भागातील अनेक घरांतील नळांना येणाऱ्या पाण्याला गटारीच्या वास व पाण्याचा उग्र वास येत आहे. त्यामुळे अनेक महिलां कष्टकरी, मध्यमवर्गीय अशा संमिश्र वस्तीचा भाग आहे. या ठिकाणी गत अनेक दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा सुरू होता. मंगळवारपासून चक्क बोरिंगच्या पाण्याला गटारीचे पाणी नळाला येत असल्याने महिला त्रस्त आहेत. या पाण्याला गटारीच्या पाण्यासारखा उग्र दर्प येत आहे.
Like Loading…
Recover your password.
A password will be e-mailed to you.