Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महाराष्ट्रात शाळा सोडण्याचे प्रमाण घटले; ७ राज्यांतील प्रमाण मात्र सरासरीपेक्षा अधिक, देशभरात काय स्थिती?

10

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याचे प्रमाण महाराष्ट्रात घटले असल्याचे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी गळतीचे वार्षिक सरासरी प्रमाण २०२०-२१मध्ये ११.२ टक्के होते. ते २०२१-२२मध्ये १०.७ टक्के झाले आहे. तर, गुजरातसह सात राज्यांतील विद्यार्थी गळतीचे प्रमाण सरासरीपेक्षा (१२.६) अधिक असल्याचे या आकडेवारीवरून दिसते.महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत १५ टक्क्यांहून अधिक प्रमाण

– २०२३-२४साठी ‘समग्र शिक्षा’ कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयांतर्गत आयोजित प्रकल्प मंजुरी मंडळाच्या (पीएबी) बैठकांच्या इतिवृत्तांतातून ही माहिती एकत्रित करण्यात आली आहे.
– यावर्षी मार्च ते मे दरम्यान राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत या बैठका झाल्या.
– या माहितीनुसार, महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी गळतीचे प्रमाण १५ टक्के आणि त्याहून अधिक आहे.

१०० टक्के नावनोंदणीचे उद्दिष्ट

-२०३०पर्यंत शालेय स्तरावर १०० टक्के एकूण नावनोंदणी दराचे (जीईआर) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे.
– हे उद्दिष्ट साध्य करण्यात शालेय विद्यार्थ्यांची गळती हा एक मोठा अडसर असल्याचे सरकार मानते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
– युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंडच्या (युनिसेफ) गेल्या वर्षीच्या सर्वेक्षणात असे म्हटले होते की, भारतात ३३ टक्के मुली घरगुती कामांमुळे शाळा सोडतात.
– शाळा सोडल्यानंतर अनेक मुले आपल्या कुटुंबीयांसोबत मजूर म्हणून किंवा लोकांकडे घरकाम करू लागल्याचेही अनेक ठिकाणी आढळून आले.

सरासरीपेक्षा जास्त प्रमाण असलेली राज्ये (२०२१-२२)

– मेघालय : २१.७
– बिहार : २०.४६
– आसाम : २०.३
– गुजरात : १७.८५
– पंजाब : १७.२
– आंध्र प्रदेश : १६.७
– कर्नाटक : १४.६
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १६ जूनपासून पाणी महागणार, पाणीपट्टी इतकी वाढण्याची शक्यता
कोणत्या राज्यात काय स्थिती?

– पश्चिम बंगालमध्ये २०२०-२१ ते २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात, विशेषत: प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.
– दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात शाळाबाह्य मुलांची संख्या जास्त आहे.
– मध्य प्रदेशात २०२०-२१मध्ये २३.८ टक्के असलेले विद्यार्थी गळतीचे प्रमाण २०२१-२२मध्ये १०.१ टक्क्यांनी कमी झाले.
– उत्तर प्रदेशमधील आठ जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी गळतीचे वार्षिक सरासरी प्रमाण खूपच जास्त आहे.
– राजस्थानमधील विद्यार्थी गळतीचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे, परंतु अनुसूचित जमाती (नऊ टक्के) आणि मुस्लिम (१८ टक्के) मुलांनी शाळा सोडण्याचे प्रमाण माध्यमिक स्तरावर अजूनही खूप जास्त आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.