तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

सरकारकडून Emergency Alert फीचरची सुरु आहे चाचणी, लवकरच मोबाईलमध्ये येणार खास फीचर

0 75

नवी दिल्ली : Emergency Alert Feature : मागील काही दिवसांपासून देशातील सर्वच मोबाईल युजर्सच्या फोनवर एक आपात्कालीन संदेश अर्थात इमरजन्सी अलर्ट मेसेज येत असल्याचं दिसून येत आहे. हे म्हणजे केंद्र सरकारकडून मोबाईल इमर्जन्सी अलर्ट फीचरची चाचणी केली जात आहे. अनेक अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्त्यांना आपत्कालीन सूचना प्राप्त झाल्या आहेत. पण सध्यातरी या सूचनांनी तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, कारण सध्या हा एक डेमो अलर्ट आहे, जो चाचणीसाठी सुरु आहे. हा अलर्ट एक फास्ट असा फ्लॅश मेसेजप्रमाणे आणि बीप आवाजासह येतो. रिपोर्ट्सचा विचार केला तर, भारतातील मोबाइल वापरकर्त्यांना २० जुलै रोजी देखील असाच एक चाचणी अलर्ट संदेश प्राप्त झाला.

असा येतो इशारा
जोपर्यंत वापरकर्ता ओके बटण दाबत नाही तोपर्यंत मोबाइल वापरकर्त्यांना बीप सारखा फ्लॅश आणि मोठ्या आवाजाचा अलार्मप्रमाणे एक फ्लॅश मेसेज स्क्रिनवर .ेको. जेव्हा तुम्ही ओके दाबता तेव्हा याचा अर्थ असा होतो की तुम्ही अलर्ट संदेश पाहिला आणि वाचला. येत्या काळात याचा भरपूर फायदा होणार आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत सरकारला कोणताही संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यात मदत होईल. असं म्हटलं जात आहे.

याचा काय फायदा होईल?
सोप्या शब्दात समजून घ्यायचे झाले तर जेव्हा भारतात पूर, वादळ, त्सुनामी भूकंप यांसारखी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते, त्या वेळी दूरसंचार विभागाकडून दूरसंचार कंपन्यांच्या माध्यमातून अलर्ट मेसेज पाठवला जातो. हे वापरकर्त्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाईल. असा मजकूर संदेश संपूर्ण भारताला पाठवला जाईल. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे काम पाहणार आहे. विशेष म्हणजे हे इमर्जन्सी अलर्ट फीचर अनेक देशांमध्ये मोबाईल कंपन्यांनी आधीच दिलेले आहे. पण भारतात हे फिचर देण्यात आले नव्हते. मात्र सरकारने मोबाईल कंपन्यांना हे फीचर देणे बंधनकारक केले आहे.

वाचा: कमी बजेटमध्ये मिळेल दमदार स्मार्टफोन, २० हजारांहून स्वस्त स्मार्टफोनची यादी एकदा पाहाच

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.