Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

व्हिडिओतील त्या आजीबाईंना विखे पाटलांची साखर मिळाली, म्हणाली कार्यकर्त्यांनीच आम्हाला…

9

अहमदनगर : भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वतीने त्यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या साखर वाटप उपक्रमात गोंधळ झाल्याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्यामध्ये एक आजीबाई याबद्दल संताप व्यक्त करताना दिसल्या. मात्र, आता बोधेगाव येथील या आजीबाईंनी आपल्याला विखे पाटील यांच्याकडून साखर मिळाली असल्याचे म्हटले आहे. उलट काही कार्यकर्त्यांनी चुकीची माहिती दिल्याने आमचा गोंधळ उडाल्याचेही आजीबाई नवीन व्हिडिओत सांगत आहेत.

दिवाळीत शिर्डी मतदार संघात साखर वाटप केल्यानंतर विखे पाटील यांच्यावतीने आता अहमदनगर लोकसभा मतदारसंघात साखर वाटप सुरू आहे. प्रत्येक तालुक्यात रेशनकार्ड धारकांना साखर आणि चना दाळ वाटप करण्यात येत आहे. ही सरकारी योजना नव्हे तर विखे पाटील स्वखर्चाने हे वाटप करीत असल्याचे सांगण्यात आले. अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मतदारसंघात दुसरी दिवाळी साजरी करण्याचा विखे पाटील यांचा मानस असून त्यानिमित्त साखर वाटप सुरू आहे.
Ahmednagar Accident: नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात, ट्रक कारवर कोसळल्याने चौघांचा मृत्यू

मात्र, या उपक्रमात शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे गोंधळ झाल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्यात संताप व्यक्त करणाऱ्या महिलेने आपल्याला १९ तारखेला साखर मिळाल्याचे म्हटले आहे. जुन्या व्हिडिओबद्दल खुलासा करताना त्यांनी म्हटले आहे की, त्यावेळीच येथे साखर वाटप करण्यात आली होती. परंतु काही विरोधी कार्यकर्त्यांनी मुद्दाम दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे हा सर्व प्रकार घडला. आम्ही आजही विखे पाटील परिवाराच्या सोबत आहोत. यापुढेही राहू. आम्हाला साखर मिळाली आहे.
शिर्डी ग्रामस्थांना विश्वासात न घेता कारभार करणं भोवलं,साई संस्थानाच्या CEOना तात्काळ कार्यमुक्त होण्याचे आदेश
रेशन कार्ड धारक कुटुंबीयांना साखर व दाळ वाटप करण्यात येत आहे. खासदार विखे पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरवात झाली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात हा उपक्रम होत आहे. बोधेगावच्या घटनेनंतर असा गोंधळ उडणार नाही, चुकीची माहिती दिली जाणार नाही, यासाठी दक्षता घेण्यात येत असल्याचे विखे पाटील यांच्या यंत्रणेकडून सांगण्यात आले. विखे पाटील यांनी पूर्वीच आपली साखर काही विरोधकांना कडू लागत असल्याचे म्हटले होते, त्यानुसार यासंबंधी गोंधळाची चुकीची माहिती मुद्दाम प्रसारित केली जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
बापानेच आजीला संपवल्याचा राग, नातवाने जन्मदात्याचा काटा काढला; नेमकं काय घडलं?
Read Latest Maharashtra News And Marathi News

विजयसिंह होलम यांच्याविषयी

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.