
Tej Police Times
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) १७ हजार कोटी रुपये खर्चून या जवळपास २२ किमी लांबीच्या सेतूची उभारणी केली आहे. त्यातील १६ किमीचा भाग समुद्रावर असून देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी पूल ठरला आहे.
वैशिष्टे
२१.८ किमीचा सेतू त्यापैकी १६.५ किमी समुद्रावर तर ५.५ किमी जमिनीवर
देशातील सर्वात लांब सागरी सेतू
मुंबई ते नवी मुंबई अंतर फक्त २० मिनिटावर
अटल सेतूवरून १०० किमी प्रतितास वेगाने प्रवास करता येणार
अवजड वाहने, दुचाकी, रिक्षा, ट्रॅक्टर यांना वाहतुकीची परवानगी नाही
अटल सेतूवरून एकेरी प्रवासासाठी २५० रुपये टोल द्यावा लागले, तर परतीचा प्रवास असेल तर ३७५ रुपये
बांधकामासाठी १ लाख ७७ हजार ९०३ मेट्रिक टन स्टील तर ५ लाख ४ हजार २५३ मेट्रीक टन सिमेंटचा वापर
पुलासाठी २१ हजार कोटी इतका खर्च
दिवसाला ७० हजार वाहने प्रवास करण्याची शक्यता
Recover your password.
A password will be e-mailed to you.