
Tej Police Times
त्यामध्ये खोबरं वाटी, खोबरं किस, खोबरेल तेल, खोबऱ्याची पावडर, वरचिग तेल, खोबरा वडी देखील बनवलं जातं. हे सर्व बनविण्यासाठी गावातील महिलांना योग्य प्रशिक्षण दिले गेले आहे. या महिला सर्व खोबरं सुखविण्यापासून आणि इतर प्रॉडक्ट बनविण्यापर्यत काम करतात. परंतु हा व्यवसाय सुरू करत असताना धनंजय राणे आणि तुषार राणे यांनी एकच निर्धार केला होता की, आपण बाहेरून कामगार आणण्यापेक्षा गावातील कामगारांना प्रशिक्षण देऊन आपल्या फॅक्टरी रुजू करावे, अशी संकल्पना त्यांच्या मनी होती. सध्या या फॅक्टरीमध्ये १२ महिला कामगार आणि ३ पुरुष कामगार आहेत. हे १२ ही कामगार आसपासच्या गावातीलचं आहेत.
सिनेमाचा समाजावर मोठा प्रभाव, पोलिसांनी टायरमध्ये घेतल्यावर फायरच होईल; पुण्यात अजित पवारांची टोलेबाजी
मूळ नारळातील पाणी बाहेर काढून ड्री हायड्रेशन केल्यानंतर मूळ प्रॉडक्ट बनवले जातात. प्रॉडक्ट बनवण्यासाठी लागणार रॉ मटेरियल जिल्ह्यातील सर्वाधिक प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामुळे लागणार रॉ मटेरियल जिल्ह्यातून मिळत. बांदा, मालवण, कुडाळ, देवगड या तालुक्यातून आणलं जाते. शेतकरी फॅक्टरीपर्यत पोच करतात. मात्र या व्यवसायातून जवळपास ७० लाख टन एवढा वर्षाचा टनवर्क आहे. त्यामध्ये १५ ते १६ लाखापर्यंत निव्वळ नफा मिळतो. कोकणातलं खोबऱ्याचं प्रॉडक्ट असल्यामुळे सुरुवातीला सिंधुदुर्गातच मार्केटिंग केलं.
जिल्ह्यातील जी महत्वाची शहर आहेत. त्या शहरांमध्ये सुरुवातीला प्रॉडक्ट लॉंच केलं. त्यामुळे हॉटेल, किराणा दुकाने, जनरल दुकान, सुपर मार्केट अशा दुकानदारांना दिलं. सुरुवातीला सुखं खोबऱ्यापासून मार्केटमध्ये टार्गेट करून ठेवलं. मात्र मार्केटमध्ये वावरत असतानाच सुरुवातीला सुखं खोबरं केरळ आणि कर्नाटकमधून कोकणात येत. ते आम्हाला केरळ, कर्नाटक व्यवसायिक प्रतिस्पर्धी दराबद्धल वाटू लागले. त्यामुळे आम्ही “शेडेट खोबरं किस” प्रॉडक्ट लॉंच केला. या प्रॉडक्टने महाराष्ट्राभर गती घेतली आहे. मुंबई, पुणे, रत्नागिरी खोबरं किस मार्केटमध्ये उपलब्ध आहे.
खडकाळ भागात शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयत्न! कलिंगडसह मिरचीची लागवड; मेहनतीच्या जोरावर लाखोंचं उत्पन्न
सध्या तर किराणा दुकानदाराना टार्गेट केलं असून भविष्यात हॉटेल व्यवसयिकांना खोबरं किस देण्याच्या प्रयत्नात आहोत. जिल्ह्यातील सुरुवातीला “मालवणी खोबरं “म्हणून प्रसिद्ध केलं. कर्नाटक, केरळच खोबरं जिल्ह्यात विकलं जात नाही. जो नारळ कोकणात तयार होतो त्याच नारळाचं किस मार्केटमध्ये विकला जातो. जसा मालवणी मसाला म्हणून कोकणात प्रसिद्ध आहे तसंच “मालवणी खोबरं किस” म्हणून विकत आहे. त्यालाही विशिष्ट चव आहे. त्यामुळे कोकणातील लोक मुंबई, पुणे या भागात असल्यामुळे आम्ही त्याचं भागांमध्ये खोबरं पाठवितो. २०१५ पासून नारळ क्षेत्रात काम करत असताना नारळ, खोबरं, काथा असं कधीच ग्रो केला जाऊ शकत नाही. तर संपूर्ण झाड ग्रो केला पाहिजे. आगामी काळात नारळापासून फ्रूड बनविण्याच्या संकल्पनेत आहोत, असं तुषार चव्हाण यांनी सांगितलं.
Recover your password.
A password will be e-mailed to you.