तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला स्टेजवरुन बोलण्यासाठी हे संपूर्ण भाषण, टाळ्यांचा कडकडाट होईल

0 62

Republic Day Speech : अध्यक्ष महोदय, माननीय मुख्याध्यापक आणि गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रीणिंनो…
यंदाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा…!

आज आपण आपल्या भारत देशाचा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. प्रजासत्ताक दिनानिमित्त माझे मत मांडण्याची माला ही संधि मिळाली ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. दरवर्षी २६ जानेवारी हा दिवस आपल्या देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय इतिहासात या दिवसाला विशेष स्थान आहे. २६ जानेवारी हा राष्ट्रीय सण म्हणून आपण मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करतो.

२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली हे आपणा सर्वांना माहीत आहे. तेव्हापासून आजपर्यंत सर्व भारतीय दरवर्षी प्रजासत्ताक दिन साजरा करतात. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले असले तरी तेथे कोणतेही राष्ट्रीय संविधान नव्हते. बराच विचारविनिमय केल्यानंतर डॉ. भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच, बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली ज्याचे काम भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणे हे होते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समितीने तयार केलेली राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारली आणि २६ जानेवारी १९५० पासून त्याची देशात अंमलबजावणी झाली.

Republic Day 2024 : प्रजासत्ताक दिन दरवर्षी २६ जानेवारीला का साजरा केला जातो..? जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्त्व
येथे, मी भारतीय राज्यघटनेशी निगडित काही महत्त्वाच्या गोष्टी फार कमी शब्दांत आपल्यासमोर मांडू इच्छितो. भारतीय संविधानात ३९५ कलमे, २२ भाग आणि १२ वेळापत्रके आहेत. पूर्वी ८ वेळापत्रक होते, नंतर काही विषयांची भर घालून वेळापत्रकांची संख्या १२ करण्यात आली आहे. ऑगस्ट २०२१ पर्यंत, राज्यघटनेत एकूण १२७ दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे, ज्याला बनवण्यासाठी तब्बल २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांचा कालावधी लागला. हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. संविधान लेखनाची रचना प्रेमबिहारी नारायण रायजदा यांनी केली आहे तर संविधान पुस्तक आणि पाने सजावटीचे काम नंदलाल बोस यांनी केले आहे. भारतीय राज्यघटनेत व्यक्तीचे काही मुलभूत अधिकार विहित केलेले असताना काही कर्तव्येही नमूद करण्यात आली आहेत.

माझ्या भाषणाच्या शेवटी मी सांगू इच्छितो की, भारत हा लोकशाही देश आहे. ज्यामध्ये लोकांना त्यांच्या देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळते. आपला देश आणखी चांगला करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. मला माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

जय हिंद, जय भारत !

Independence Day VS Republic Day: ‘स्वातंत्र्य दिन’ आणि ‘प्रजासत्ताक दिन’ यातील नेमका फरक काय..? जाणून घ्या

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.