Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शांतिगिरी महाराजांचा नाशिक लोकसभेसाठी अर्ज, पक्षाच्या नावापुढे शिवसेना लिहिल्याने संभ्रम

8

शुभम बोडके, नाशिक : महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाचा ट्विस्ट काही संपता संपत नसल्याचं चित्र आहे. विद्यमान शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे. अशातच महायुतीतर्फे निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या स्वामी शांतिगिरी महाराज यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाच्या नावापुढे शिवसेना असं लिहिलं आहे, मात्र त्यांच्याकडे एबी फॉर्म नसल्याची माहिती आहे.

स्वामी शांतिगिरी महाराज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, की आमच्या लोकसभेच्या मंडळींना निर्णय घेतला आहे. सार्वत्रिक निवडणूक जनता जनार्दन कमिटीच्या मार्फत होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पक्षाकडून मी फॉर्म भरला. हा निर्णय आमच्या कमिटीने घेतला. मुख्यमंत्र्यांनी आमचे सगळे मुद्दे शांततेने ऐकून घेतले. मुद्द्यांच्या आधारे आपण निर्णय नंतर करु. ही भगवंतांची इच्छा आम्ही समजतो. प्रभू रामाच्या हातात धनुष्य आहे. त्यांची इच्छा असेल तर ते बरोबर करतील, असंही स्वामी म्हणाले.
काँग्रेस सोडली, वंचितकडून तिकीट, शिर्डीत ट्विस्ट आणणाऱ्या उत्कर्षा रुपवते जरांगेंच्या भेटीला
आम्ही महायुतीचे उमेदवार यासंदर्भात कोणतेही वक्तव्य केलेले नाही भक्त परिवाराने विडा उचलला या वेळेला लढायचं आणि जिंकायचं. आमच्या भक्त परिवाराने परस्पर चर्चा केली आहे, त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही. एबी फॉर्म आमचे वकील आणि भक्त परिवार ते निर्णय घेतील. शिंदे म्हणाले योग्य तो निर्णय घेऊ, आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, असं स्वामी शांतिगिरी महाराज यांनी सांगितलं.
शिवतीर्थवर पोहोचताच फॅमिली ग्रुपवर मेसेज टाकला… संकर्षण कऱ्हाडे-राज ठाकरे भेटीचा अफलातून किस्साRead Latest Maharashtra News Updates And Marathi News

नाशिकच्या जागेवर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादीचे नेते आणि इच्छुक उमेदवार छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीतून माघार घेतली. त्यानंतरही राष्ट्रवादीने आपला दावा कायम ठेवला होता. तर शिंदेसेनेतही अजय बोरस्ते यांचं नाव चर्चेत होतं.

कोण आहेत शांतीगिरी महाराज?

शांतीगिरी महाराज हे जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी आहेत. त्यांचा लाखोंचा भक्त परिवार आहे. देशभरात त्यांचे ११५ आश्रम असून सात गुरुकुलांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण दिले जाते.

२००९ मध्येही ते छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांना जवळपास दीड लाख मतं मिळाली होती. महाराज त्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर राहिले, परंतु त्याचा फटका चंद्रकांत खैरेंना बसला होता. कारण मत विभाजनामुळे त्यांना केवळ ३२ हजारांची लीड मिळाली होती. नाशिक ही संतांची भूमी असल्याने या भूमीतून रामराज्य आणण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा शांतीगिरी महाराजांनी केली होती.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.