तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Loksabha Election: इंडिया आघाडीच्या बाजूने जर निकाल नसेल, तर त्याला कारणीभूत… निकालापूर्वी दिग्गज नेत्याचे सूचक वक्तव्य

0 50

तामिळनाडू : द्रमुक पक्षाचे संघटन सचिव आरएस भारती यांनी लोकसभा निवडणूक निकालाच्या आदल्या दिवशी सूचक वक्तव्य केले आहे. भारती म्हणाले लोकसभा निवडणुकीचे निकाल कोणत्याही शक्यतेने जर इंडिया आघाडीच्या बाजूने आले नाहीत तर त्याला कारणीभूत आघाडीचा भाग असलेले काही पक्ष आणि नेत्यांमधील मतभेद असतील.

शनिवारी मांडण्यात आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपा सत्तेत पुन्हा पदार्पण करणार असल्याचे समजते. दरम्यान द्रमुक पक्षाचे वरिष्ठ नेते भारती यांनी आयएएनएसला वृत्तसंस्थेशी संवाद साधताना इंडिया आघाडीबद्दल सूचक वक्तव्य केले आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्याआधी त्यांनी इंडिया आघाडीतील काही पक्षांना लक्ष्य केले आहे. तर आघाडीतील घटक पक्षांसोबत जुळवून घेण्यासाठी द्रमुकने काही तडजोडी केल्याचे देखील नमूद केले आहे.
Sansad Bhavan : संसद सुरक्षा यंत्रणेत विचित्र अस्वस्थता, PSS कर्मचाऱ्यांना नोकरीची चिंता
द्रमुक नेते भारती यांनी आयएएनएसला वृत्तसंस्थेला सांगितले की, मतमोजणीच्या वेळी उपस्थित असलेल्या पक्षाच्या एजंट्सकडे कदापि दुर्लक्ष केले जाऊ नये. तसेच त्यांनी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजयासाठीचे मताधिक्य खूपच कमी असल्याचे देखील अधोरेखित केले आहे.

भारती पुढे म्हणाले की, आम्ही आघाडीतील घटक पक्षांसोबत जुळवून घेण्यासाठी बऱ्याच तडजोडी केल्या आहेत, इंडिया आघाडीच्या हितासाठीच आम्ही काम करत आहोत. तरीही, आमचा २०२९ मधील २४ जागांवरील विजयाच्या तुलनेत २०२४ मध्ये आकडा २२ वर घसरला आहे.

‘काही चुकीचं घडणार असेल तर त्यासाठी काही घटक पक्षांनी इंडिया आघाडीच्या हितासाठी आघाडीतील पक्षांशी जुळवून न घेणे हे मोठं कारण ठरेल.’ असे सूचित करत त्यांनी प्रामुख्याने पश्चिम बंगाल आणि केरळ राज्यातील नेतृत्वाचा उल्लेख केला आहे.
निकालाला काहीच तास बाकी, काँग्रेसच्या उमेदवारांसोबत राहुल गांधी आणि खर्गे यांची तातडीची बैठक, कारण काय? वाचा…
द्रमुकच्या दिग्गज नेत्याने निवडणुकीतील वातावरणाबद्दल देखील टिप्पणी केली आहे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी खूप मेहनत घेतली होती आणि दोन्ही नेत्यांच्या सभांना उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. तसेच गांधी भाऊबहिणीच्या हाय व्होल्टेज प्रचारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या प्रचाराच्या वेळापत्रकात बदल करणे भाग पडले होते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.