
Tej Police Times
घराणेशाहीचा आरोप होऊ नये म्हणून प्रियंका गांधी निवडणूक लढल्या नाहीत. पण त्यांनी अमेठी, रायबरेलीत जातीनं लक्ष दिलं. उत्तर प्रदेशात त्या विशेष सक्रिय होत्या. त्यामुळे काँग्रेसच्या जागा एकवरुन सहावर गेल्या. २०१९ मध्ये रायबरेलीत पराभूत झालेले राहुल गांधी वायनाडमधून विजयी झाले. यंदा त्यांनी अमेठी आणि रायबरेलीतून निवडणूक लढवली. दोन्ही जागा त्यांनी मोठ्या मताधिक्क्यानं जिंकल्या. आता राहुल वायनाडची जागा सोडू शकतात. त्यांनी तसे संकेत दिले आहेत. राहुल यांनी वायनाडची जागा सोडल्यावर तिथे सहा महिन्यांत पोटनिवडणूक होईल. प्रियंका गांधी वायनाडमधून विजयी झाल्यास गांधी भावंडं लोकसभेत दिसतील. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं ९९ जागा जिंकल्या आहेत.
Recover your password.
A password will be e-mailed to you.