Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात, मतदारसंघ ठरला? लवकरच लोकसभेत दिसण्याची शक्यता

8

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक सुरु असताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी केरळच्या वायनाडमधून लढतील अशी चर्चा होती. पण प्रियंका गांधींनी निवडणूक लढण्यास नकार दिला. राहुल गांधी वायनाडसह रायबरेलीतून लढले. दोन्ही जागा त्यांनी मोठ्या फरकानं जिंकल्या. यानंतर आता राहुल गांधी वायनाडची जागा सोडू शकतात. त्यामुळे वायनाडसाठी प्रियंका गांधींच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसकडून प्रियंका गांधींना वायनाडमधून तिकीट मिळू शकतं. त्यामुळे लवकरच प्रियंका यांची निवडणुकीच्या रिंगणात एन्ट्री होऊ शकते.

माझी बहीण वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढली असती, तर मोदी दोन ते तीन लाख मतांनी पराभूत झाले असते, असं राहुल गांधी मंगळवारी म्हणाले होते. त्यानंतर प्रियंका गांधी पोटनिवडणूक लढवणार असल्याची चर्चा जोरात सुरु झाली आहे. प्रियंका गांधी वाराणसीतून लोकसभा लढतील अशी चर्चा २०१९ मध्येही झाली होती. यानंतर २०२० मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी प्रियंका गांधी उत्तर प्रदेश काँग्रेसच्या महासचिव होत्या.
लोकसभेत सुसाट कामगिरी करणाऱ्या ‘इंडिया’ला धक्का? १० पैकी ९ जागांवर NDAचा विजय पक्का
लोकसभा निवडणूक २०२४ च्या आधी सोनिया गांधींनी रायबरेलीची जागा सोडली. त्या या मतदारसंघातून २००४ पासून निवडून जात होत्या. यावेळी मात्र सोनिया गांधींनी राज्यसभेवर जाण्याचा पर्याय निवडला. सोनिया गांधींनंतर प्रियंका गांधी रायबरेलीतून लढतील अशी चर्चा होती. पण तसं घडलं नाही. राहुल गांधी रायबरेलीतून लढले आणि विजयी झाले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल, प्रियंका यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी याबद्दलचा निर्णय बहीण, भावांवर सोपवला होता. राहुल, प्रियंका काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून न लढल्यास कार्यकर्ते आणि इंडिया आघाडीत चुकीचा संदेश जाईल, असं खरगेंना वाटत होतं.

घराणेशाहीचा आरोप होऊ नये म्हणून प्रियंका गांधी निवडणूक लढल्या नाहीत. पण त्यांनी अमेठी, रायबरेलीत जातीनं लक्ष दिलं. उत्तर प्रदेशात त्या विशेष सक्रिय होत्या. त्यामुळे काँग्रेसच्या जागा एकवरुन सहावर गेल्या. २०१९ मध्ये रायबरेलीत पराभूत झालेले राहुल गांधी वायनाडमधून विजयी झाले. यंदा त्यांनी अमेठी आणि रायबरेलीतून निवडणूक लढवली. दोन्ही जागा त्यांनी मोठ्या मताधिक्क्यानं जिंकल्या. आता राहुल वायनाडची जागा सोडू शकतात. त्यांनी तसे संकेत दिले आहेत. राहुल यांनी वायनाडची जागा सोडल्यावर तिथे सहा महिन्यांत पोटनिवडणूक होईल. प्रियंका गांधी वायनाडमधून विजयी झाल्यास गांधी भावंडं लोकसभेत दिसतील. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं ९९ जागा जिंकल्या आहेत.



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.