तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Om Birla यांच्या आणीबाणीवरील वक्तव्यावर Rahul Gandhi नाराज, बैठकीनंतर म्हणाले- ‘स्पीकरने असे …’

0 45

Rahul Gandhi Objection: लोकसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बुधवारी (२६ जून २०२४) आणीबाणीचा निषेध करणारा ठराव वाचला. यावेळी त्यांनी आणीबाणीचा तीव्र शब्दात निषेध केला आणि हा देशाच्या इतिहासातील काळा अध्याय असल्याचे म्हटले. दरम्यान, राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांसमोर आणीबाणीच्या प्रस्तावावर नाराजी व्यक्त केली. असे राजकीय प्रस्ताव टाळले पाहिजेत, असे ते म्हणाले.

त्यावर राहुल गांधींनी घेतला आक्षेप

लोकसभा अध्यक्षांसमोर आणीबाणीच्या निषेधाच्या प्रस्तावावर राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आणि सभापतींनी असा राजकीय प्रस्ताव आणायला नको होता आणि तो टाळायला हवा होता, असे म्हटले. इंडिया आघाडीच्या नेत्यांसह राहुल गांधी यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा शिष्टाचार भेट कालच प्रस्तावित करण्यात आली होता, मात्र आजच्या बैठकीत आणीबाणीच्या प्रस्तावावर विरोधक संतप्त झाले आहेत.
LOP Rahul Gandhi: एका झटक्यात राहुल गांधींच्या हाती आली सुप्रीम पॉवर; विरोधी पक्षनेते होताच प्रोटोकॉल लिस्टमध्ये स्थान

काँग्रेसच्या सरचिटणीसांनीही आक्षेप

आणीबाणीच्या निषेधाच्या प्रस्तावावर काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनीही आक्षेप घेतला होता. ते म्हणाले होते, ‘सभापतींनी हा मुद्दा (आणीबाणी) कसा मांडला हे आपल्या सर्वांसाठीच आश्चर्यकारक आहे. सरकारने जाणीवपूर्वक आजची निवड केली. सभागृहात आज चांगले वातावरण होते, सभापतीपदासाठी निवडणूक होत होती, भाजप आणि केंद्र सरकार ते वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत होते ,
Rahul Gandhi : राहूल गांधींची पॉवर वाढली..कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जाचे हे आहेत विरोधीपक्ष नेत्याचे अधिकार

अखिलेश यादव यांनी भाजपवर साधला निशाणा

आणीबाणीचा निषेध करण्याच्या प्रस्तावावरून अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाणा साधला होता. ते म्हणाले, ‘भाजपने आज जे काही केले ते केवळ दिखावा आहे. त्यावेळी (आणीबाणी) ते केवळ तुरुंगात गेले नाहीत तर सपा आणि इतर नेत्यांनीही तो काळ पाहिला. किती काळ आपण भूतकाळाकडे पाहत राहणार? लोकशाही रक्षक सेनानींना दिला जाणारा भत्ता भाजप वाढवणार का?

काल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेत आपल्या भाषणात आणीबाणीचा उल्लेख केला होता. त्यामुळे संसदेत काही काळ गदारोळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच त्यांच्या या वक्तव्याचा पडसाद लोकसभेच्या पायऱ्यांवरही पाहायला मिळाला. भाजप खासदारांनी हातात फलक घेऊन निदर्शने केली होती.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.