Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कंबरभर पाण्यात गाडी घालण्याचा अतिशहाणपणा नडला, पुण्यात कार वाहत निघाली, इतक्यात…

10

पुणे: पुण्यात आज पावसाने दानादान उडवली. पुणेकरांची पहाट हे पुराच्या पाण्याने झाली. पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक भागात पाणी साचलं तर नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक पूल हे पुराच्या पाण्याखाली गेले. प्रशासनाने काही पूल वाहतुकीसाठी बंदही केले. त्यात एका व्यक्तीने पुणे पुलावर पाणी दिसत असतानाही चारचाकी पाण्याच्या प्रवाहात घातली. त्यानंतर ही गाडी थेट पाण्याच्याप्रवाहात वाहून जाऊ लागली. या घटनेने साऱ्यांच्या कळजात धडकी भरली.

नेमकं काय घडलं?

लोहगाव येथे असणाऱ्या चऱ्होली बुद्रुक येथे भोसले वस्ती येथे पुलावरून पाणी वाहत होते. यावेळी चारचाकी चालकाने पाण्याच्या प्रवाहात गाडी घातली. मात्र, पाण्याच्या प्रवाहमुळे गाडी पाण्यात वाहून जावू लागली. त्यावेळी योगेश भोसले नावाच्या व्यक्तीने या चारकीतील नागीरकांना सुखरूपरित्या वाचवले. डी वाय पाटील कॉलेज जवळ ही घटना घडली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Pune Rain News: लवासामध्ये भीषण दुर्घटना, दोन व्हिलांवर दरड कोसळली, चार जण अडकल्याची भीती

स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दोघांना वाचवलं

योगश भोसले हे चऱ्होली गावचे सुपुत्र आहेत. त्यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता कारमध्ये वाहून चाललेल्या दोन व्यक्तींचे प्राण वाचवले आहेत. त्यांच्या या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. जीव वाचल्यानंतर गाडीतील प्रवाशांनी योगेश यांचे आभार मानले असून त्यांना आशीर्वाद देखील दिले आहेत. शिरूर लोकसभा मतदार संघांचे खासददार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील योगेश भोसले यांचे अभिनंदन केले आहे.

yogesh bhosale.

योगेश भोसले

पुण्यात पूरस्थिती, घरात पाणी, नागरिकांचे हाल

रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानंतर पहाटे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे मुठा नदीला पूर आला आणि आसपासच्या परिसरात छातीपर्यंत पाणी भरलं. पुणेकर साखर झोपेत असताना अचानक घरात पाणी शिरलं आणि एकच गोंधळ उडाला. अचानक पाणी भरल्याने नागरिकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही आणि ते जिथे होते तिथेच अडकून पडले. त्यानंतर त्यांना बोटीतून बाहेर काढण्यात आलं. तर, आता पुन्हा एकदा खडकवासला धरणातून ४०००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग होणार असून परिस्थिती अजून भीषण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर काम करत आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.