महायुतीत वादाचे खटके! अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आणि शिंदेंच्या सेनेत शाब्दिक युद्ध

Mahayuti : विधानसभेच्या तोंडावर महायुतीत वादाचा नवा अंक सुरु झाला आहे. शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा कलगीतुरा रंगलेला मागील एक आठवड्यापासून पाहायला मिळत आहे. अशातच महायुतीत सर्व काही आलबेल असल्याचे वरवर नेते दाखवत असले तरी मात्र अंतर्गंत कलह आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
अजित पवार राष्ट्रवादी विरुद्ध मुख्यमंत्री शिंदे सेना
अकोला, प्रियंका जाधव : अर्थ खात्यासारखं नालायक खातं नसल्याचं वादग्रस्त वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते. यावर राष्ट्रवादीकडून उत्तर आले आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी गुलाबराव पाटलांवर जोरदार पलटवार करत थेट सरकारच्या कामाकाजावर टीका केली आहे. गुलाबराव पाटलांच्या खात्यात किती फाईल अडकलेल्या आहेत? याचा आम्ही लेखाजोखा द्यायचा का? असा सवाल आमदार मिटकरी यांनी केलाय. गुलाबराव पाटलांच्या विधानाचे वक्तव्याचं उत्तर आता थेट मुख्यमंत्र्यांनीच द्यावे अशी मागणी आमदार मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यानंतर अमोल मिटकरी म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास विभागात किती फाईल अडकलेल्या आहेत? याचा प्रश्न आता आम्ही उपस्थित करावेत का असा सवाल करत थेट सीएम शिंदेंच्या कार्यप्रणालीवर मिटकरी यांनी टीका केली आहे.

याआधीच शिवसेनेचे नेते आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीसोबत कॅबिनेटमध्ये सोबत बसत असलो तरी बाहेर आल्यावर उलटी होते. असे विधान केले होते. याच वादग्रस्त विधानावरून महायुतीत वाद चव्हाट्यावर आला होता. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सावंत यांना ‘एक्स’वर प्रत्युत्तर दिले. ‘जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात, हाफकिन संस्थेला माणूस म्हणू शकतात, धाराशीव येथील भैरवनाथ साखर कारखान्याचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करू शकतात आणि अजित पवार यांच्याकडून निधी घेऊ शकतात ते काहीही बोलू शकतात,’ अशी उपरोधिक टीका मिटकरींनी केली होती. एकंदरीत महायुतीत विधानसभेच्या तोंडावर रोज नवनवे वाद चव्हाट्यावर आलेले दिसत आहेत.

तर वड्डेटीवारांचे अन्न पाणी बंद होईल..

दरम्यान, अजित पवार मोदींच्या जीवावर जगत असल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. याच विधानाचा खरपूस समाचार घेत अमोल मिटकरी यांनी वक्तव्यावर पलटवार केला आहे. विजय वडेट्टीवार हेच चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या भरोशावर जगत असल्याचा आरोप आमदार मिटकरी यांनी केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली तर वडेट्टीवार यांचे अन्न पाणी बंद होईल, असा टोला सुद्धा आमदार मिटकरी यांनी लगावला.

मिटकरींचा महायुतीला सल्ला

भाजपने लाडकी बहीण योजनेचा श्रेय एकट्याने न उचलता महायुतीतील सर्व पक्षांनी घेतला तर याचा चांगला परिणाम आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मिळेल असा सल्लाही मिटकरी यांनी दिला आहे. जर महायुती असे करत नसेल तर तुमचे राजकीय भविष्याचे काही खरे नाही असा सल्ला मिटकरींनी महायुतीला दिला आहे.

लेखकाबद्दलप्रतीक्षा बनसोडेपत्रकारिता क्षेत्रातील पाच वर्षाचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सध्या डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी डीडी नॅशनल, लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये रिपोर्टर म्हणून काम केले आहे. झी २४ तासमध्ये डिजीटल टीममध्ये काम केलं आहे. राजकीय आणि सामजिक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

amol mitkari on gulabrao patilmahayuti disputeअजित पवारअमोल मिटकरीगुलाबराव पाटीलतानाजी सावंतमहायुतीसीएम एकनाथ शिंदे
Comments (0)
Add Comment