Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
लालबा जाधव हा बी.एड आणि डी. एड पदवीधर आहे. दोन ते तीन वर्ष त्याने नोकरीच्या शोध घेतला. पण नोकरी काही मिळाली नाही. शेवटी शेतीची कास धरत काहीतरी वेगवेगळे प्रयोग करण्याचा निर्णय त्याने घेतला. आपल्या १२ एकर शेती पैकी तीन एकरमध्ये पपईची लागवड केली. अहमदनगर जिल्हातील तरांडा या गावातून १० रुपये प्रतीप्रमाणे २ हजार ७०० पपईचे रोप खरेदी केले. तीन ते चार फुटावर पपईच्या रोपाची लागवड केली. यातून त्याला समाधानकारक पीक फुलले तर सध्या पपई तोडणीला आली आहे. बाजारात १५ ते १६ रुपये किलोप्रमाणे चांगला दर देखील मिळत असल्याचे लालबा जाधव याने सांगितले.
लालबा जाधव हा बी.एड आणि डी. एड पदवीधर आहे. दोन ते तीन वर्ष त्याने नोकरीच्या शोध घेतला. पण नोकरी काही मिळाली नाही. शेवटी शेतीची कास धरत काहीतरी वेगवेगळे प्रयोग करण्याचा निर्णय त्याने घेतला. आपल्या १२ एकर शेती पैकी तीन एकरमध्ये पपईची लागवड केली. अहमदनगर जिल्हातील तरांडा या गावातून १० रुपये प्रतीप्रमाणे २ हजार ७०० पपईचे रोप खरेदी केले. नंतर तीन ते चार फुट अंतराने त्याने पपईच्या रोपाची लागवड केली. यातून समाधानकारक पीक फुलले तर सध्या पपई तोडणीला आली आहे. बाजारात १५ ते १६ रुपये किलोप्रमाणे चांगला दर देखील मिळत असल्याचे लालबा जाधव याने सांगितले.
पपईसोबतच इतर पीकेही जोमदार
अर्धापूर तालुका हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यातील केळी देश विदेशापर्यंत जातात. मात्र केळीच्या पिकासोबत येथील शेतकरी बारमाही शेतीकडे वळताना दिसत आहे. लालबा जाधव यांनी आपल्या १२ एकर शेतीमध्ये पपईसोबतच केळी, हळद, सोयाबीनची शेती फुलवली आहे. यातून त्याला भरघोस उत्पन्न देखील मिळत आहे, यंदाही त्यांची सर्व पीके जोमदार आहेत. लालबा जाधव प्रमाणे तालुक्यातील इतर शेतकरी देखील बारमाही शेतीकरून उन्नती साधत असल्याचे पाहावयास मिळत आहे.