तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Pitru Paksha 2024: पितृपक्षात करा हे उपाय पितृदोष होईल कमी, श्राद्ध कसे करावे जाणून घ्या सविस्तर

0 48

Importance Of Pitru Paksha: तुम्हाला पितृदोषाचा त्रास होत असेल तर त्याचे निवारण करण्यासाठी पितृपक्ष सर्वोत्तम मानला जातो. पितृदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय करावेत तसेच श्राद्धाचे किती प्रकार असून ते नक्की कोणासाठी आहेत त्याबद्दल अधिक जाणून घेवूया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Pitru Dosh Upay:

रामायण आणि महाभारत यामध्ये पितृपक्ष, श्राद्ध आणि तर्पण याचा उल्लेख आहे. असे म्हणतात की पितृपंधरवड्यात आपले पूर्वज धरतीवर येतात आणि पिंडदान मिळाले की तृप्त होवून आशिर्वाद देवून निघून जातात. दोष निवारण करण्यासाठी ज्योतीषशास्त्रानूसार हा कालवधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पुराणशास्त्रात तीन ऋण सांगतिले आहेत. पहिला देव ऋण, दुसरा ऋषी ऋण तर तिसरा पितृ ऋण. तुम्हाला या ऋणांसदर्भात काही करायचे असेल तर पितृपंधरवडा हा अत्यंत उत्तम काळ मानला जातो.

पितृपक्षात कावळ्याला भोजन देणे

पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या नावाने जेवण दिले जाते. एक पान गच्चीत ठेवून कावळ्याला ते खाण्यासाठी बोलावले जाते. शास्त्रानुसार पितृपक्षात कावळ्याला खायला देणे किंवा जेवायला देणे हे अत्यंत शुभ असून तुम्हाला दोषातून तसेच ऋणातून मुक्ती मिळते. आपण कळतनकळत निसर्गाचे संरक्षण देखील करत असतो. निसर्गाच्या संरक्षणाचा भार कावळ्यांवर असून ऋषीमुनींच्या मतानुसार आपले पुर्वज कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात. या काळात मादी कावळा पिल्लांना जन्म देते आणि त्यांना पौष्टीक आहाराची गरज असते.कावळा प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण कावळा पृथ्वी स्वच्छ ठेवण्यात मोलाची कामागिरी पार पाडतो. पिंपळ, वड यासारख्या बहुउपयोगी वृक्षांचे पुनरुत्पादन कावळ्यांच्या मार्फत होत असते. म्हणून तर कावळ्याला शनिचे प्रतिक मानतात.

या दोन वृक्षांची पूजा

पिंपळ आणि वड या दोन वृक्षांना शास्त्रात खूप महत्त्व आहे. धार्मिक विधी आणि पर्यावरणासाठी हे वृक्ष फार महत्त्वाचे आहेत. पिंपळ १०० टक्के ऑक्सिजन देतो आणि प्राणवायू शिवाय आपण जगू शकत नाही. त्यामुळे कावळ्यांना जेवू घालून आपण निसर्ग ऋण देखील कमी करतो.

पितृदोष दूर करण्याचे उपाय

यंदा तब्बल १८ वर्षांनंतर पितृपंधरवड्यात कन्या राशीत केतू सोबत सूर्य असणार आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत हा योग जुळून येतो आहे, त्यांनी केशर घातलेली खिर तयार करून त्याचे दान द्यायला हवे. जर तुम्हाला पितृदोषाचा त्रास होत असेल तर या उपायासह दानधर्म करा. तुमचा पितृदोष नक्की कमी होईल. दर्भाद्वारे काळे तीळ पाण्यात मिसळून दक्षिण दिशेला अर्पण केल्यास पूर्वज प्रसन्न होतात. तसेच काही विशेष तिथीमध्ये श्राद्ध केल्यास पितृदोषातून मुक्ती मिळते.

पितृपक्षातील श्राद्धाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

पंचमी श्राद्ध
ज्या पूर्वजांचा मृत्यू अविवाहीत स्थितीमध्ये आणि पंचमी तिथीला झाला आहे, त्यांचे श्राद्ध पंचमी तिथीला केले जाते.

नवमी श्राद्ध
नवमी तिथीला मातृनवमी असे म्हणतात. या तिथीला श्राद्ध केले असता कुळातील दिवंगत महिलांचे श्राद्ध केले जाते.

चतुर्दशी श्राद्ध
ज्या नातेवाईकांचा अकाली मृत्यू झाला आहे, त्यांचे श्राद्ध चतुर्दशी तिथीला केले जाते.

सर्वपित्री अमावस्या
ज्या नातेवाईकांच्या मृत्यूची तिथी निश्चित माहिती नाही, त्यांचे श्राद्ध सर्वपित्री अमावस्या या दिवशी केले जाते.

जसे देवीदेवता आपल्या घरी येतात आणि आपण त्यांचा आदर करतो. त्यांच्यासाठी खास भोजन तयार केले जाते. त्याचप्रमाणे पितृपंधरवड्यात आपले पूर्वज घरी येतात आणि आपण दिलेले भोजन ग्रहण करून तृप्त होतात, आपल्याला आशिर्वाद देतात. येणाऱ्या पिढ्यांसाठी आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी, संरक्षणासाठी हे खूप महत्त्वपूर्ण आहे.

डॉ मधु प्रिया प्रसाद
(एस्ट्रोलॉजर एंड वस्तु एक्स्पर्ट)

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.