Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

हवाई प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री; दिवाळीनिमित्त विमान तिकीट महागले, असे आहेत नवे दर…

5

Nagpur Airport: दिवाळी यंदा २८ ऑक्टोबर वसूबारसपासून ते ३ नोव्हेंबर भाऊबीजपर्यंत आहे. या पार्श्वभूमीवर ‘मटा’ने विविध शहरातील विमानसेवेच्या तिकिटांचे दर पाहिले असता नेहमीच्या तुलनेत दर अव्वाच्या सव्वा वाढलेले आढळले.

महाराष्ट्र टाइम्स
Flight AI

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : दिवाळीनिमित्त गावी परत येण्याच्या घाईत असलेल्यांनी वाढलेल्या हवाई प्रवासदराचा धसका घेतला आहे. दरवर्षी दिवाळीदरम्यान तिकिटांचे दर वाढतात. मात्र, यंदा दुपटीपेक्षाही अधिक दराने दिवाळीदरम्यान तसेच त्यानंतरही विक्री होत असल्याचे चित्र आहे.

दिवाळी यंदा २८ ऑक्टोबर वसूबारसपासून ते ३ नोव्हेंबर भाऊबीजपर्यंत आहे. या पार्श्वभूमीवर ‘मटा’ने विविध शहरातील विमानसेवेच्या तिकिटांचे दर पाहिले असता नेहमीच्या तुलनेत दर अव्वाच्या सव्वा वाढलेले आढळले. २८ ऑक्टोबरला मुंबई-नागपूर विमानाचा दर १८ ते २० हजार रुपयांपर्यंत आहे. पुणे-नागपूर ११ ते १३ हजार, हैदराबाद-नागपूर १४ हजार असा दर दाखवित आहे. तर ४ नोव्हेंबरला नागपूरहून परत जाऊ इच्छिणाऱ्यांना नागपूर-पुणे यासाठी १२ ते १३ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. त्याशिवाय, नागपूर-दिल्ली १२ हजार, नागपूर-मुंबई १३ ते १६ हजार, नागपूर-हैदराबाद १७ हजार रुपये दर आहे.

याबाबत टूर्सच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, सण-उत्सवाचे दिवस वगळता इतर दिवसांमध्ये विमानाच्या तिकिटाचे दर तुलनेने कमी असतात. दिवाळीनंतर १५ दिवसांनी दर कमी होतील. त्यानंतर डिसेंबरच्या अंतिम आठवड्यात दर वाढणार आहेत. ही परिस्थिती दरवर्षी असते. परंतु, गो फर्स्ट एअरलाइन्सच्या विमानांचे संचालन बंद पडले. परिणामत: इंडिगो एअरलाइन्सने याचा फायदा घेत दरवाढ केली आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. सध्या इंडिगोची मक्तेदारी निर्माण झाली आहे. त्याचा फायदा घेत दर प्रचंड वाढविण्यात आले आहेत. या दरवाढीमुळे प्रवासी संतप्त आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यावेळी झालेली दरवाढ ग्राहकांना परवडणारी नाही.
‘रिपाइं’चा महायुतीवर बहिष्कार; विधानसभा निवडणुकीत जागा सोडल्या नसल्यामुळे ठराव
इंधन स्वस्त होऊन फायदा काय?

अलीकडेच तेलाच्या किंमतीत झालेली घसरण यामुळे विमानाचे प्रवास भाडे कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. प्रत्यक्षात इंधन स्वस्त होण्याचा ग्राहकांना काहीही फायदा झालेला नाही. गेल्यावर्षी मर्यादित क्षमतेमुळे दिवाळीच्या आसपास विमान भाड्यात वाढ झाली होती. ज्याचे मुख्य कारण म्हणजे गो फर्स्ट एअरलाइनचे निलंबन होते. यावर्षी अतिरिक्त क्षमतेची भर पडल्याचे सांगण्यात येत असले तरी दरांकडे पाहता ग्राहकांना फारसा दिलासा दिसून येत नाही.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.