Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मोठी बातमी : मुंबईतील २९ ठिकाणी गोवराचा उद्रेक; राज्यभरात युद्धपातळीवर लसीकरण होणार

14

मुंबई : गोवराच्या संसर्गाचा उद्रेक नियंत्रणात आणण्यासाठी सहा ते नऊ महिने आणि नऊ महिने ते पाच वर्षे या वयोगटामध्ये करण्यात येणाऱ्या अतिरिक्त लसीकरणातंर्गत राज्यातील चार लाख बालकांना लसमात्रा देण्यात येणार आहे. राज्यात ६२ ठिकाणी गोवराचा उद्रेक झाल्याचे आरोग्यविभागाने केलेल्या सर्वेक्षणात दिसून येत आहे. मात्र, यातील १६ भागांमध्ये ६ ते ९ महिने या वयोगटामध्ये दहा टक्के बालकांना संसर्ग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच भागांमध्ये या वयोगटातील बालकांना ही मात्रा देण्यात येणार आहे.

भिवंडी (ग्रामीण) येथील संसर्गाचा उद्रेक सोडला; तर इतर सर्व उद्रेक हे शहरी भागांमध्ये असल्याचे दिसून येते. नियमित लसीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कुठेही बदल करण्यात आलेला नाही. उद्रेक असलेल्या भागांमध्ये नऊ ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना, तर दहा टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णसंख्या असलेल्या भागांमध्ये सहा ते नऊ महिने या वयोगटामध्ये गोवरप्रतिबंधक मात्रा देण्यात येणार आहे. मुंबईमध्ये ही संख्या एक लाख ३० हजार इतकी आहे. पालकांना पूर्ण विश्वासात घेऊन, तसेच त्यांना संपूर्ण माहिती दिल्यानंतर, त्यांचे शंकासमाधान केल्यानंतर हे लसीकरण करण्यात येईल, असे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

आठवड्यातील सर्वेक्षण, व्हिटॅमिन ‘ए’चे वाटप आणि लसीकरण अशा तीन पातळ्यांवर हे काम सुरू आहे. राज्याचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी मध्यम जोखमीच्या जिल्ह्यांत मासिक आढावा घेणे व अतिजोखमीच्या जिल्ह्यांमध्ये पाक्षिक आढावा घेणे, तसेच गोवर-रुबेला इम्युनिटी प्रोफाइल, सर्वेक्षण निर्देशक, साथरोगशास्त्रीय उद्रेकांचे ट्रॅकिंग करण्याच्या पातळीवर काम सुरू असल्याचे स्पष्ट केले.

एक हजार लोकसंख्येमागे एक सत्र

राज्यातील जी बालके कुपोषित आहेत, त्यांची पूर्ण माहिती महिला व बालविकास विभागाकडून घेण्यात येणार आहे. या बालकांमध्ये गोवराचा संसर्ग होऊन त्यातून गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असल्याने, या मुलांमध्ये लसीकरण, व्हिटॅमिन ‘ए’च्या मात्रा देणे, त्यांचे वजन-उंची, उपचारात्मक पोषण अशा विविध पातळ्यांवर वैद्यकीय काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात एका टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली असून, एक हजार लोकसंख्येमागे एका लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येते. राज्यात अंदाजे ५० लाख लोकसंख्येमध्ये संशयित गोवर रुग्णांचा संसर्ग असल्याची वैद्यकीय शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा संसर्ग नियंत्रित स्वरूपात राहतो की, त्यात इतर ठिकाणी वाढ होते, हा विचारही यात प्राधान्याने होत आहे. उद्रेक नियंत्रण व्यवस्थापनामध्ये किती मुलांमध्ये संसर्ग आहे, याची नोंद घेण्यात येणार आहे.

पुराच्या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग; देशातील असा पहिला पाणीपुरवठा प्रकल्प बिहारमध्ये सुरू

लसीकरणाच्या प्रतिसादाकडे लक्ष

ज्या भागांत सहा ते नऊ महिने वयोगटामध्ये संसर्गाचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा अधिक आहे, तिथे या वयोगटात प्रतिबंधक मात्रा देण्यात येणार आहे. या भागांमध्ये या वयोगटातील लसीकरणाला प्रतिसाद कसा मिळतो, याचाही अभ्यास करण्यात येणार आहे. सहा ते नऊ महिन्यांहून लहान वयाच्या बाळांमध्ये गोवर-रुबेलाची अतिरिक्त मात्रा दिल्यानंतरही नियमित लसीकरण हे वेळापत्रकानुसार करण्यात यावे, असेही निर्देश देण्यात आले आहे. ज्या बालकांना आता गोवरचा संसर्ग झाला आहे, त्यांचे एक महिन्यानंतर लसीकरण करण्यात येईल.

राज्यस्तरीय टास्क फोर्समध्ये जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. महिला व बालविकास, शिक्षण, नागरी विकास, वैद्यकीय शिक्षण अशा विविध विभागांकडून कोणत्या बाबींवर सहाय्य मिळावे, याची सूची तयार करण्यात आली आहे. तसेच लशींची पुरेशी उपलब्धता आहे.

– संजय खंदारे, प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.