
Tej Police Times
महाराष्ट्राच्या मनात संतापाची भावना आहे, याचा उद्वेग होणारच…!
भाजपच्या आराध्य दैवतांकडून छत्रपती शिवरायांचा अपमान होतोय आणि त्यांचे नेते शहाणपण शिकवतात. महाराष्ट्र हे सगळं बघतोय, महाराष्ट्राच्या मनात संतापाची भावना आहे, याचा उद्वेग झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देतानाच राज्यपालांविरोधात महाविकास आघाडी उदयनराजे-संभाजीराजेंसोबत असल्याचं सूतोवाच राऊतांनी केलं.
राजकारण ही मिमिक्री नाही
राजकारण करणं म्हणजे मिमिक्री करणं नव्हे. आम्हाला जर ओरिजिनल मिमिक्री पाहायची असेल तर आम्ही जॉनी लिव्हरची पाहू. आम्हाला जर मुद्राभिनय, नाट्याभिनय पाहायचा असेल तर आम्ही जॉनी लिव्हरला पाहू ना…आम्हाला राजू श्रीवास्तव आवडायचा… आवाज काढणं वगैरे आता खूप झालं… याच्यापलीकडे जा.. आता आपण मॅच्युअर झालेला आहात. महाराष्ट्र पाहा… राजकारणात काही विधायक काम करा, संघटनात्मक काम करा, असं प्रत्युत्तर देतानाच उद्धव ठाकरेंवर टीका करुन वा दुसऱ्या पक्षावर किंवा नेत्यावर बोलून तुमचं राजकारण किती काळ चालणार, असा सवालही राऊतांनी राज ठाकरेंना विचारला.
टीका कसली करता, उद्धव ठाकरेंचं बुलढाण्यातील भाषण ऐका!
“जे आमच्यावर टीका करतायेत, जे उद्धव ठाकरेंवर टीका करतायेत, त्यांनी आमची बुलडाण्याची सभा पाहायला हवी होती, त्यांनी उद्धव ठाकरेंचं बुलडाण्याचं भाषण ऐकायला हवं होतं.. अख्ख्या बुलडाण्याचा प्रतिसाद त्यांनी पाहायला हवा होता… बुलडाण्याच्या लोकांनी उद्धव ठाकरेंचं केलेलं अभूतपूर्व स्वागत उभ्या महाराष्ट्राने पाहिलं”
राहुल गांधींएवढे चार दिवस कष्ट घेऊन दाखवा
राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेसाठी जेवढे कष्ट आणि मेहनत घेतली तेवढे कष्ट त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी चार दिवस घेऊन, असा टोला त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला.
Recover your password.
A password will be e-mailed to you.